HW News Marathi
महाराष्ट्र

येत्या ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

नागपूर | महाराष्ट्राच्या काही भागात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. शुक्रवारपासून नागपूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावासाचा जोर शनिवार आणि रविवारी देखील कायम राहणार असल्याची शक्यता हवामान खात्या कडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागपूरमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

शुक्रवारपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे शहरात पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूकीला अडतळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. याशिवाय काही भागांमधील वीजपुरवठादेखील खंडित झाला असून लोकांचे प्रचंड हाल देखील झाले. शुक्रवारी मुसळधार पावसाचा फटका विधीमंडळाच्या कामाकाजालादेखील बसला. विधीमंडळाचा वीजपुरवठा खंडित झाल्याने काल कामकाज होऊ शकले नाही.

आज हवामान खात्याने पुढील ४८ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आज नागपूरमधील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. नागपूरच्या महापालिकेत भाजपाची सत्ता असताना नागपूरात पावसाने पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले आहे. विधीमंडळाचे कामकाज आणि नागपूरात पुरस्थिती निर्माण झाल्यामुळे आजच्या दैनिक सामनामध्ये देखील शिवसेना अध्यक्षांनी अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपाचा चांगलाच समाचार घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवी होळकर पुतळा बसवा”, गोपीचंद पडळकरांची मागणी

News Desk

पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील १८ तर भंडारा जिल्ह्यातील ७८ रस्ते वाहतुकीकरिता बंद

Aprna

नारायण राणेंना दुसरा धक्का! नाशिक पोलिसांकडून नोटीस जारी

News Desk
महाराष्ट्र

…मग सभागृहात अंधार कसा ? | अजित पवार

News Desk

मुंबई | पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्यादिवशी विधानभवनातील कामकाज सकाळी १० वाजता सुरू झाले आहे. विरोधक मुख्यमंत्र्याच्या राजीनामा मागण्यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून आंदोलन करत होते. त्याचवेळी सभागृहाची बत्ती गुल झाली होती. सरकारच्या भोंगळ कारभाराबाबत सर्वच विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्त केली.

पावसाळी अधिवेशन नागपूरला घ्यायचं की नाही यामध्ये सरकारने बराच वेळ घालवला आणि घ्यायचं ठरवल्यानंतर यंत्रणेला काम करायला वेळ मिळाला नाही. त्यानंतर हा आजचा खेळखंडोबा झालेला दिसत आहे. ही बाब निषेधार्य आणि चुकीची आहे, असे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. विशेष करुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातही लाईट नसल्याने त्यांनी मोबाईलच्या बॅटरीवर कागदपत्रांची पाहणी केली. सभागृहात लाईट नसल्याने अजित पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

ऊर्जामंत्री सांगत आहेत लाईट आहे…लाईट आहे… मग सभागृहामध्ये लाइट का नाही… सबस्टेशनमध्ये लाइट का नाही. स्वत:विधानसभेच्या अध्यक्षांना येवून पाहणी करावी लागत आहे. ही काम त्या यंत्रणेची आहेत. परंतु त्या यंत्रणेला काम करण्यासाठी जो वेळ दयावा लागतो. तो वेळ दिला गेला नाही. हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होते. मग पावसाळी अधिवेशन नागपूरला का हवे होते.

उपराजधानीत पावसात सभागृहाची इतकी अवस्था होते तर इकडे अधिवेशन घेण्याचा इतका हट्टाहास कशाला पाहिजे होता, असा सवाल करतानाच इथे पर्यायी व्यवस्थाही करण्यात आलेली नाही,जी आहे. तीपण एका तासाने जाईल असे सांगण्यात आले. अशाप्रकारचा गलथान कारभार पावसाळी अधिवेशनात चालला आहे. आजचं हे सरकारचं अपयश आहे .महाराष्ट्रातील जनतेने हे चित्र पहावे. विधानभवन परिसरात पाणी तुंबलेले दिसत आहे. त्यामुळे कामकाज ठप्प झाले आहे असेही अजित पवार म्हणाले.

Related posts

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज शिवसेनेत पक्ष प्रवेश करत हाती शिवबंधन बांधणार

News Desk

लोकशाही राहिली का?याचा देशाने विचार करणे गरजेचे, राऊतांच्या कारवाईनंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Aprna

“मनसेने लोकांमध्ये भीती व संभ्रम निर्माण होईल असे वक्तव्य करू नये”, मनसेच्या ‘त्या’ आरोपाला राष्ट्रवादीचे उत्तर  

News Desk