HW News Marathi
महाराष्ट्र

समान सत्तावाटपातही इतके वाट्यास आले नसते, सामनातून काँग्रेसवर बोचरी टीका

मुंबई | महाविकासआघाडीतील काँग्रेस पक्ष नाराज असल्याच्या चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात रंगल्या आहेत. मात्र, काँग्रेसच्या नाराजी मागे खर कारण काय हे सामनाच्या आजच्या (१६ जून) अग्रलेखात सांगितले आहे. सामनाच्या अग्रलेखात काँग्रेस जुनी खाट, असा उल्लेख केला आहे. राज्यपाल नियुक्त १२ विधान परिषद जागांच्या समान वाटपाचा मुद्द्यावरून राजकारणातील ही जुनी खाट महाराष्ट्रात कुरकुरू करत असल्याचे सांगितले आहे. विधानसभेच्या संख्याबळानुसार काँग्रेसच्या वाट्यास आले ते समान सत्तावाटपातही इतके वाट्यास आले नसते, असे म्हणत काँग्रेसवर बोचरी टीका केली आहे.

दरम्यान, काँग्रेसचे विधानसभेतील संख्याबळ 44, शिवसेना 56 व इतर जोडीदार पकडून ते 64 वर पोहोचले. राष्ट्रवादी काँग्रेसचे 54. त्यामुळे त्या प्रमाणात वाटप व्हायला हरकत नाही. सत्ता वाटपात सगळ्यात मोठा त्याग शिवसेनेने केलेला आहे. विधानसभा अध्यक्षपदाचा वाद काँग्रेस-राष्ट्रवादीने सुरू केला. शरद पवार थोडे नाराज झाले तेव्हा काँग्रेसने अध्यक्षपद घ्यावे व त्याबदल्यात शिवसेना आपल्या वाट्याचे एक कॅबिनेट मंत्रिपद राष्ट्रवादीला देत आहे, असे सांगून हा वाद मिटवला. काँग्रेसला राज्यमंत्र्यांचे प्रमोशन करून दोन कॅबिनेट दिले. समान सत्तावाटपातही इतके वाट्यास आले नसते, पण मुख्यमंत्र्यांनी कुरकुर न करता दिले व त्याबद्दल सहा महिन्यांत कोणाची खाट कुरकुरली असे झाले नाही, असे म्हणत काँग्रेसला विधानपरिषदेत कोणतेही जागा देण्याचा विचार नसल्याचे स्पष्ट संकेत सामनातून दिले आहे.

संबंधित बातम्या

शरद पवारांना सरकार चालवण्याचा दांडगा अनुभव ,सामनातून राष्ट्रवादीचे कौतुक तर काॅंग्रेसवर टीका

राजकारणातील जुनी खाट ‘काँग्रेस’ महाराष्ट्राच्या राजकारणात का कुरकुरतेय ?

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कावेरी पाणी वाटपासाठी ३ मे रोजी सुप्रीम कोर्टाची पुढील सुनावणी

News Desk

आपल घरं का सोडायचं ? पंकजांच्या भाजप सोडण्याच्या चर्चांना पुर्णविराम !

News Desk

स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर सरकारला जाग, MPSC बाबत घेतला मोठा निर्णय

News Desk