HW News Marathi
महाराष्ट्र

परिस्थिती काही करण्यास भाग पाडते

पुणे | परिस्थिती माणसाला काही करण्यास भाग पाडते यांचे उत्तम उदाहरण म्हणजे नुकतेच पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या घटनेवरुन कळते. पुणे शहरातील वाकड परिसरात असलेल्या यमुना नगरमध्ये काही चोरांनी सोने, चांदी न चोरता चक्क भाजीपाला आणि कपडे चोरल्याची घटनासमोर आली आहे.

या परिसरात वारंवार भाजीपाला चोरींची घटना होत होत्या. त्यामुळे एका भाजी विक्रेत्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा लावला होता. सीसीटीव्हीमुळे हा सर्वप्रकार उघडकीस आला. या भुरट्या चोरांकडून भाजीपालाच नाही तर कपडेही लंपास केले जात आहेत. ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून ही पोलीस चोरांना पकडण्यास अपयशी आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने तरी पोलिसांनी या चोरांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिककडून होत आहे.

चोरीचे हे प्रकरण तुम्हा आम्हाला विचारात पाडणारे आहे. देशात एका बाजूला तरुण-तरुणी सुशिक्षित होण्याच्या प्रमाण वाढत आहे, दर दुसऱ्याबाजूला सुशिक्षित बेरोजगारचे प्रमाणातही तितकीच वाढ होताना दिसत आहे. नोकऱ्या न मिळाल्यामुळे तरुण-तरुणी हे गैरमार्गाचा वापर करुन आपल्या प्रथमिक गरजा पूर्ण करत आहे.

पण, भाजीपाला आणि कपडे यासारख्या गोष्टी चोरल्या जात असेल तर जे व्यक्ती हे चोरी करत असतील. या चोरी करण्यामागचे नेमके कारण का? असा सवाल येथे उपस्थित होत आहे. पोलिसांनी नव्हे तर तुम्ही आम्ही सर्वांनीच याचा शोध घेणे गरजेचे आहे. म्हणजे आज लोकांच्या अन्न, वस्त्र आणि निवारा यासारख्या प्रथमिक गरजा देखील पूर्ण होत नाहीत का?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शरद पवारांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीला अपघात

News Desk

FDA कमिशनर अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली, परिमल सिंह नवे आयुक्त

News Desk

वीरपत्नी लेफ्टनंट स्वाती महाडिक यांची यशोगाथा

News Desk
देश / विदेश

चिनमध्ये आहे कुबेराची राजधानी, प्रत्येकाची कमाई ८० लाख

News Desk

बिजिंग- चीनमधील जियांगसू प्रॉविन्समधील वाक्शी गाव आपल्या वैशिष्ट्यामुळे सध्या चर्चेत आळे आहे. या गावाला चीनचे ‘सुपर विलेज’ आणि जगातील सर्वात श्रीमंत गाव म्हटले जाते. हे गाव कुबेराची राजाधानी म्हणून ओळखले जाते.

गावातील सर्वांकडे स्वतःचे घर, कार आणि भरपूस संपत्ती आहे. शांघायपासून 135 किमी दूरवर असलेल्या या गावात आज शेकडो कंपन्या आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात शेतीही केली जाते. एका व्यक्तीच्या प्रयत्नातून हे साध्या झाले आहे 1961 मध्ये हे गाव खूपच गरीब होते. एकी व्यक्तीने केलेल्या प्रयत्नांमुळे या गावात समृद्धी आली. कम्युनिस्ट पार्टीचे लोकल सेक्रेटरी वू रेनबाओ असे या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी या गावात समृद्धी प्लॅन बनवला व इंडस्ट्री आणली. त्यांनी कंपनीची स्थापना करून सामूहिक शेतीला प्रोत्साहन दिले गावातील प्रत्येक व्यक्ती शेयर होल्डर बनवली. त्यातून लोकांचे आयुष्य समृद्ध झाले. अनेकांना उत्पन्नाचे साधन मिळाले. 2014 मध्ये येथील प्रत्येक व्यक्तीचे वार्षिक सरासरी उत्पन्न 88लाख रुपये एवढे होते. आजही या गावाला कुबेराची राजधानी म्हणून ओळखले जाते.

Related posts

“……. तर केंद्र सरकार लवकरच कोसळणार”, माजी मुख्यमंत्र्याचा इशारा

News Desk

आसाराम बापूला जामीन मिळणार का ?

News Desk

हेलिकॉप्टर दुर्घटनेतील शहीद निनाद मांडवगणे यांचे पार्थिव निवासस्थानी दाखल

News Desk