HW News Marathi
महाराष्ट्र

सोलापूरात ‘एक मराठा…लाख मराठा’चा आवाज घुमला, मराठ्यांचा आक्रोश मोर्चा ! अनेकांची धरपकड

सोलापूर । सोलापूरात पुन्हा मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होत. सोलापूरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथून आज (४ जुलै) सकाळी ११ वाजता या मोर्च्याला सुरुवात झालीअसून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा नेण्यात आला होता. दरम्यान, पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली असली तरी मराठा आंदोलक मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात वेगवेगळ्या चर्चा होतांना आपण पाहतोय आणि याच पाश्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघाल आहे. एकीकडे मराठा समाजाच्या वतीने राज्यातील विविध भागांत सतत आंदोलने , मोर्चे निघतायंत, तर विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर या मुद्दावरून आरोप प्रत्यारोपाचा सडा अंथरता आहेत, या मोर्चासाठी खासदार छत्रपती उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे, नारायण राणे, रामदास आठवले यांना निमंत्रण देण्यात आलं होते. मात्र यापैकी कुणीही मोर्चाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला आहे. सोलापूर शहरात तब्बल २ हजार तर ग्रामीण भागात २ हजार पोलिसांचा फौजफाटा होता. यावेळी शहरात येणाऱ्या सर्व मार्गांवर नाकेबंदी करण्यात आली आहे.

तसंच या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. दरम्यान मराठा आक्रोश मोर्चाला सोलापूर शहर पोलीसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजक राम जाधव, किरण पवार यांना नोटीस देण्यात आली आहे. मात्र असं असलं तरी मराठा आक्रोश मोर्चा काढणारच अशी भूमिका आयोजकांनी घेतली आहे. त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता बंदोबस्तासाठी सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलीस, एसआरपीएफच्या तुकड्या, होमगार्ड यांच्यासह सातारा, सांगली, उस्मानाबाद इत्यादी ठिकाणाहून अतिरिक्त पोलिसांची तुकडी मागवण्यात आली आहे

पावसाळी अधिवेशनाचा एक दिवस वाढवा, मराठा आरक्षणाचा प्रश्न निकालात काढा

पावसाळी अधिवेशनाचा एक दिवस वाढवावा पण मराठा आरक्षणाचा प्रश्न निकालात काढावा अशी मागणी करत आम्ही शांततेत मोर्चा काढणार असून पोलिसांनी सहकार्य करावे, असे आवाहन माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केले आहे. मात्र मराठा तरुणांची अडवणूक किंवा दडपशाही केल्यास त्यामुळे होणाऱ्या उद्रेकास राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औरंगाबादेत शिवसेनेचा महापौर

News Desk

सेना-भाजप एकत्र आल्यास नवल वाटू नये!, भाजप नेत्याचं मोठं विधान

News Desk

ठाकरे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू, विरोधकांचा आक्रमक पवित्रा

swarit