HW News Marathi
Covid-19

केंद्राचा मोठा निर्णय ! CBSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द

नवी दिल्ली । देशात गेल्या काही दिवसांपासून CBSE बोर्डाच्या १२ वी परीक्षांबाबत निर्माण झालेला संभ्रम आता अखेर दूर झाला आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज (१ जून) या संदर्भात घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये CBSE बोर्डाच्या १२च्या परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या कोरोनास्थितीत विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये असा विचार करून CBSE बोर्डाच्या १२च्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी आजच्या उच्चस्तरीय बैठकीत घेतला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी हा निर्णय घेताना असे म्हटले की, “विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीकोनातून CBSE च्या १२वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा हेच सर्वाधिक प्राधान्य असेल. त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये परीक्षेसंदर्भात निर्माण झालेला संभ्रम आता संपायला हवा. कोरोनासारख्या तणावपूर्ण आणि आव्हानात्मक वातावरणात विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची सक्ती केली जाऊ नये. सर्व संबंधितांनी याबाबत विद्यार्थ्यांकडे संवेदनशीलतेने पाहावे”, अशी आशा देखील पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.

केंद्र सरकरकडून ह्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जरी घेण्यात आला असला तरीही, ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची असेल त्या विद्यार्थ्यांना जेव्हा परिस्थिती सामान्य होईल तेव्हा ही परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल”, असेही केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याचसोबत, परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा प्रश्न उपस्थित झाला असून CBSC कडून निश्चित अशा मानकांनुसार नियोजित वेळ ठरवून मूल्यमापन करून निकाल जाहीर करण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.

आता HSC बोर्डाबाबत राज्य सरकार काय निर्णय घेणार ?

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी याबाबत झालेल्या सुनावणीमध्ये CBSE बोर्ड आणि केंद्र सरकारला आपला निश्चित असा निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, केंद्र सरकारने आज आपला हा निर्णय स्पष्ट केला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकारनेही बारावीच्या परीक्षांबाबत आम्हाला केंद्र सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा असल्याने सांगितले होते. केंद्राच्या निर्णयानंतर HSC बोर्डाच्या परीक्षांबाबत राज्य सरकार अंतिम निर्णय घेईल, असेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. दरम्यान, आता केंद्राचा तर CBSE बाबतचा निर्णय आलेला आहे. त्यामुळे HSC बोर्डाबाबत राज्य सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज कोरोनाचे १६०२ नवे रुग्ण, बाधितांचा आकडा २७५२४ वर

News Desk

हे तर ‘फ्युज’ उडालेलं सरकार ! चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

News Desk

राज्यात आज ७८८३ रुग्ण झाले कोरोनामुक्त

News Desk