HW News Marathi
महाराष्ट्र

दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून वेगळा विचार सुरू !

पुणे | “दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून वेगळा विचार सुरु आहे. सरकार त्यांनादेखील मदत करेल,” असे आश्वासन राज्याचे अर्थमंत्री जंयत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. जयंत पाटील पुढे म्हणाले की, “राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे इतर नेते त्यासाठी विचार करत आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली आहे, अशा शेतकऱ्यांसाठी आम्ही एक योजना आणणार आहोत. तसेच दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या, त्यांनी घेतलेले एकूण कर्ज, आणि त्यावरील व्याजाची माहिती आम्ही गोळा करत आहोत. ज्यांचे कर्ज दोन लाखांपेक्षा जास्त आहे, आमचे सरकार त्यांनादेखील न्याय देईल. शेतकऱ्यांना हेलपाटे घालावे लागणार नाहीत, याचीदेखील काळजी घेतली जाईल.”

महाविकासआघाडीच्या सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे कर्जमाफी करण्याची घोषणा केली. सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला या योजनेला ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९’ असे नाव देण्यात आले आहे. या योजनेनुसार दोन लाखांपेक्षा अधिकचे थकित कर्ज असेल, तर शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नसल्याचे सरकारच्या अध्यादेशात उघड झाले आहे. अल्पमुदतीच्या कर्जासाठीच ही कर्जमाफी योजना लागू होणार आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णायवर विरोधकांकडून टीका होऊ लागल्यानंतर दोन लाखापेक्षा जास्त कर्जमाफी वेगळा विचार करू असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राऊतांच्या पक्षाकडे जितके आमदार, त्यापेक्षा जास्त दलित बांधव भाजपचे खासदार! – राम सातपुते

Aprna

महाराष्ट्र भाजपमुक्त करायचा आहे – नाना पटोले

swarit

ST कर्मचाऱ्यांच्या पाठिशी, चुकीच्या नेतृत्वाच्या नाही! – शरद पवार

Aprna