HW News Marathi
महाराष्ट्र

“उडता पंजाब’ नंतर ‘उडता महाराष्ट्र’ करण्याचा कट होता” – नवाब मलिक

मुंबई। समीर वानखेडे हा खोटारडा माणूस आहे. ड्रग्ज पेडलर्सना अभय देणं आणि ट्रॅपमध्ये हायप्रोफाईल लोकांना अडकवणं आणि त्यांच्याकडून खंडणी गोळा करणं हा समीर वानखेडेंचा उद्योग आहे. माझा लढा एनसीबीविरोधात नाही. माझा लढा भाजपविरोधात नाही. माझा लढा या माणसाविरोधात आहे. अस्लम शेख यांनाही पार्टीचं निमंत्रण देण्यात आलं होतं. काशिफ खान हा अस्लम शेख यांना पार्टीत येण्यासाठी आग्रह करत होता. उडता पंजाबनंतर उडता महाराष्ट्र करण्याचा कट होता असा आरोप आज नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन खळबळ उडवून दिली आहे.

नवाब मलिकांनी बोलणं थांबवलं नाही तर तुझा मुलगा दीर्घ काळ तुरुंगात राहिल

शाहरुख खानलाही समीर वानखेडेंनी धमकावलं होतं. नवाब मलिकांनी बोलणं थांबवलं नाही तर तुझा मुलगा दीर्घ काळ तुरुंगात राहिल अशी धमकी समीर वानखेडेंनी दिली होती. असाही आरोप आज नवाब मलिकांनी केला आहे. या पार्टीला अस्लम शेख यांना काशिफ खान का घेऊन जाणार होता? मंत्र्यांच्या मुलांना का ट्रॅप करत होता? कट रचून ड्रग्जचा खेळ सरकार चालवत आहे अशी बदनामी करण्याचा हा डाव होता, असा दावा करतानाच अस्लम शेखही हे सुद्धा या प्रकरणाची माहिती देतीलच. आता या प्रकरणाची मुंबईच्या एसआयटीनेही चौकशी केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

या चांडाळ चौकडीला बाहेर ठेवा

कोणत्याही नेत्यावर आम्ही आरोप करत नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकारमधील ही लढाई नाही. तर एनसीबीत जी चांडाळ चौकडी बसली आहे त्यांना एक्सपोज करत आहोत. या चांडाळ चौकडीला बाहेर ठेवा, त्यांच्यामुळे डिपार्टमेंटची बदनामी होत आहे. यांची चौकशी करा. लॉजिकल एंडपर्यंत प्रकरण न्या, अशी आमची वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती आहे. तुमची बदनामी करू नका. देशाला नशामुक्त करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं आवाहन त्यांनी केलं. ड्रग्जची साफसफाई झाली पाहिजे. पण ही चांडाळ चौकडी राहिली तर साफसफाई होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता राज्यातील गोरगरिबांना १० रुपयांत मिळणार भोजन

News Desk

गुप्तेश्वर पांडे वरिष्ठ अधिकारी होते मात्र भाजपचे नेते असल्यासारखे बोलत होते, गृहमंत्र्यांचा टोला

News Desk

उद्धव ठाकरे म्हणतात, मी चुकलो तर त्याला जबाबदार पवार…

News Desk