HW News Marathi
महाराष्ट्र

३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवा नाही तर…!

मुंबई। येत्या ३ मेपर्यंत राज्य सरकारने मौलवींशी चर्चा करून मशिदीवरील भोंगे उतरवा. नाही तर मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे. राज ठाकरेंनी काल (१२ एप्रिल) ठाण्यात ‘उत्तर सभा’ घेतली होती. या सभेतून राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, महाविकासआघाडीच्या नेत्यांवर तोफ डागली.

राज ठाकरे म्हणाले, “३ तारखेला ईद आहे. माझी राज्य सरकारला आणि गृहखात्याला विनंती आहे की, कुठलाही तेढ, दंगल निर्माण करायची आमची इच्छा नाही. आम्हाला महाराष्ट्राचे स्वास्थ्य बिघडवायची बिलकूल इच्छा नाही. आज १२ तारीख आहे. १२ एप्रिल ते ३ मे, महाराष्ट्रातल्या सगळ्या मशिदींमधल्या मौलवींशी तुम्ही बोला, त्यांना सांगा, सगळे लाऊडस्पीकर खाली उतरवले पाहिजेत, ३ तारखेनंतर तुम्हाला आमच्याकडून कोणताही त्रास होणार नाही. “

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गेली २०-२५ वर्ष कॉंग्रेस-राष्ट्रवादीचीची पालिकेत सत्ता आहे… सुप्रिया सुळेंच्या आरोपावर महापौरांची प्रतिक्रिया!

News Desk

भाजपकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्री, १३ मंत्रिपदांची ऑफर ?

News Desk

‘जेएनयू’च्या विद्यार्थ्यांवरील जीवघेणा हल्ला, २६/११ची आठवण करून देतो !

News Desk