HW News Marathi
Covid-19

नोव्हेंबरपर्यंत जग कोरोनामुक्त होईल – हसन मुश्रीफ

अहमदनगर | ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी संगमनेर येथे आज (९ जुलै) एक बैठक घेतली. यावेळी त्यांनी “नोव्हेंबरपर्यंत जग कोरोनामुक्त होईल”, असा दावा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलाआहे. मुश्रीफ आज कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या संगमनेरमध्ये आहेत.

“नोव्हेंबरपर्यंत जग कोरोनामुक्त होईल. सप्टेंबर महिन्यापर्यंत कोरोना रुग्णसंख्या कमी होईल”, असा विश्वासही हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.“मुंबई, पुण्याहून आलेल्या लोकांमुळे अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. लक्षणे आढळल्यास कोरोना हेल्थ केअर सेंटरला जाऊन तपासणी करावी.

जिल्ह्यात संगमनेर तालुक्याचा कोरोनाचा मृत्यूदर सर्वाधिक नऊ टक्के आहे”, असंही त्यांनी सांगितले. “जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व्हे वाढवण्यासोबत कोरोना चाचण्या वाढवाव्यात”, असे आदेशही हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत.

“तीन पक्षांचे आघाडी सरकार आहे. तीन पक्षांची समन्वय समिती स्थापन केली आहे. मात्र आपल्या तीन पक्षातील लोक आपल्या आपल्यातच पक्षांतर करत असतील तर काय करावे. याचा विचार अद्याप झाला नव्हता. जर भारतीय जनता पक्षाला रोखायचे असेल तर यावर आपल्याला मार्ग काढावा लागेल”, असेही त्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज ५ हजार ५०५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk

कराडचे नाव झळकणार जगाच्या नकाशावर, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून लस विकसित

News Desk

किराणा दुकानांच्या वेळेत पुन्हा बदल?, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष

News Desk