HW News Marathi
महाराष्ट्र

वाईनबाबत राज्य शासनाने घेतलेल्या निर्णय रद्द करावा, ‘या’ गावात अन्नत्याग आंदोलन

नांदेड | आर्धापूर तालुक्यातील सावरगाव येथील श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी व गावकऱ्यांनी काही दिवसापूर्वी राज्य सरकारने किराणा दुकानवर वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करत श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी अन्यत्याग आंदोलनास काल (११ फेब्रुवारी)  सुरुवात केली. या अन्नत्याग आंदोलनास गावकऱ्यांनी देखील पाठिंबा दिला.

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे जोरदार विरोध असून शासनाने हा निर्णय मागे घेण्याची मागणी जोर धरू लागलीय. ग्रामीण भागातून जोरदार विरोध होत असला तरी सरकार मात्र वाईन विक्रीचा विषयावर गप्प असल्याने ग्रामीण भागातील किराणा दुकानावर वाईन विक्रीचा निर्णय शासनाने मागे घ्यावे. अन्यथा जनांदोल छेडण्याचा ईशारा आंदोलन कर्त्यांने दिलाय अर्धापूर श्रीगुरुदेव सेवा मंडळ जिल्हा प्रसारक गजानन योगाजी आबादार यांनी हनुमान मंदिरा समोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. तरी त्यांच्या आंदोलनाची दखल घेत आज गावातील ग्रामपंचायत सदस्यांनी सर्वानुमते ग्रामपंचायतमध्ये ठराव घेऊन व तसेच उपोषणकर्त्यांना पाठिंबा देऊन राज्य शासनाने हा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती येथील गावकरीव उपोषणकर्त्यांनी केलीय

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज 3,586 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 67 रुग्णांचा मृत्यू!

News Desk

‘माझ्या जावयाला राजकारण माहिती नाही’, खडसे पुन्हा भाजपवर बरसले

News Desk

‘महाप्रित`ने इथिओपियाबरोबर नविनीकरणीय ऊर्जा प्रकल्पांमध्ये एकत्रित काम करावे! –  धनंजय मुंडे

News Desk