HW News Marathi
Covid-19

दिलासादायक ! राज्यात आज ३१ हजारांहून अधिक रुग्ण ‘कोरोनामुक्त’

मुंबई | राज्यातील कोरोनास्थिती गेल्या काही दिवसांपासून दिलासादायक आहे. कारण राज्यातील दररोज नोंद होणारा कोरोनमुक्तांचा आकडा हा दररोज नोंद होणाऱ्या नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यांहून अधिक आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (२९ मे) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज २० हजार २९५ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर याच एका दिवसात नव्या ३१ हजार ९६४ कोरोना बाधित रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत.

राज्यातील अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत एकूण ५३ लाख ३९ हजार ८३८ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. तर सद्यस्थितीत राज्यात एकूण २ लाख ७६ हजार ५७३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. याचसोबत आणखी एक दिलासादायक बाब अशी कि राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून आता ९३.४६% इतके झाले आहे. राज्यातील दुसरी लाट ओसरत असल्याचे हे चित्र दिलासादायक आहे. मात्र, संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता खबरदारी राखणे अत्यंत आवश्यक आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज ८२४१ रुग्ण कोरोनामुक्त

News Desk

अधिकाऱ्यांच्या आधीच राजेश टोपे हजर, नवे जिल्हाधिकारी पळत बैठकीला उपस्थित

News Desk

केंद्राकडून देण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्सचे तत्काळ ऑडिट करा ! पंतप्रधानांचे आदेश

News Desk