HW News Marathi
देश / विदेश

तृतीयपंथी समाजाकडून निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल

मुंबई | साखर उद्योगांना वाचवण्यासाठी राष्ट्र्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले. त्यानंतर माजी खासदार निलेश राणे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यात ट्विटरवर जोरदार वाद रंगला. या दोन नेत्यांच्या वादात राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी देखील उडी घेतली. त्यानंतर निलेश राणे यांनी प्राजक्त तनपुरे यांच्यावर अत्यंत खालच्या दर्जाची टीका केली. त्यामुळे आता निलेश राणे चांगलेच अडचणीत आले आहे. निलेश राणेंनी वापरलेल्या यावेळी आक्षेपार्ह शब्दामुळे तृतीयपंथी समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. इतकेच नव्हे तर निलेश राणेंविरोधात तृतीयपंथी समाजाकडून जळगावात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“निलेश राणेंनी तृतीयपंथी समजाबाबत उपहासात्मक आणि अब्रुनुकसानीकारक विधान केले आहे”, असे म्हणत जळगावच्या यावल तालुक्यातील फेजपूरच्या सामाजिक कार्यकर्ता भानुदास पाटील ऊर्फ शमिभा पाटील यांनी निलेश राणेंविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, निलेश राणेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करतानाही निलेश राणेंनी राष्ट्रवादीवर निशाणा साधण्याची संधी सोडलेली नाही. “मी जर तृतीयपंथीयांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझा रोख एका व्यक्तीवर होता इतर कोणावर नाही. पण तुम्ही माझ्यावर केसेस केल्या तरी चालतील कारण माझा उद्देश तुम्हाला दुखावण्याचा कधीच नव्हता”, असे म्हणत पुढे निलेश राणेंनी राष्ट्रवादीवर पुन्हा एकदा टीका केली आहे.

नेमके प्रकरण काय ?

साखर उद्योगाला वाचवण्याची मागणी करणारे पत्र जेव्हा शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना लिहिले तेव्हा निलेश राणेंनी टीकेचे शस्त्र उगारले होते. “साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले ह्यावर audit झालंच पाहिजे. साखर कारखाने करोडोंची उलाढाल करतात, राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षों वर्ष साथ देत आलेत. तरी वाचवा??”, असे ट्विट निलेश राणेंनी केले होते. त्यानंतर रोहित पवारांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आणि हे शाब्दिक युद्ध सुरु झाले.

राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांनी देखील निलेश राणे आणि रोहित पवारांच्या या वादात उडी घेतल्याने निलेश राणेंनी प्राजक्त तनपुरे यांच्यावरही अत्यंत खालच्या भाषेत टीका केल्याचे पाहायला मिळाले. निलेश राणेंनी तनपुरे यांच्यावर टीका केल्याचे रोहित पवार यांनी तनपुरे यांना समजवताना केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणतात कि, “आपले विचार, आपली भाषा व आपलं काम यातून आपण कोण आहोत हे लक्षात येतं. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्या सोडून द्यायच्या असतात, पण एकाच गोष्टीला कवटाळून आपल्या विचारांचं प्रदर्शन करण्यात निलेश राणे यांचा नंबर पहिला लागतो.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उर्जित पटेल यांच्याबाबत तुम्हाला या गोष्टी माहित आहेत का ?

News Desk

संजय राऊत आज दिल्लीतील शेतकरी आंदोलकांना भेटणार

News Desk

येडियुरप्पांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

Adil