HW News Marathi
महाराष्ट्र

भीमा-कोरेगाव दंगली प्रकरणी, सुधीर ढवळेंसह दोन जणांना अटक

पुणे | पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेचे आयोजकांना भीमा कोरेवाग दंगली प्रकरणी अटक केली आहे. यात एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे यांना पुणे, दिल्लीतून माओवाद्यांचे नेते रोना विल्सन आणि वकील सुरेंद्र गडलिंग यांना नागपूर या तिघांना पुणे पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी अटक केले आहे. मंगळवारी मध्यरात्री पुणे पोलिसांनी या तिघांना अटक केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली.

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने १ जानेवारी २०१८ रोजी आंबेडकरी अनुयायी येथे आले होते. तेव्हा दोन गटात झालेल्या किरकोळ वादातून दगड फेक झाली होती. यात एक जण जखमी झाला असून एकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मिलिंद एकबोटे व संभाजी भिडें यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून मिलिंद एकबोटे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

या दंगलपूर्वी शनिवार वाड्यावर एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असताना या तिघांचे कनेक्शनातून आढळून आले होते. त्यामुळे पुणे पोलिसांनी गेल्या महिन्यात या तिघांच्या घर व कार्यालयावर छापे टाकले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

News Desk

चहावाल्यांच्या नादी लागू नका | देवेंद्र फडणवीस

News Desk

नाशिक-पवन एक्स्प्रेसचे ४ डबे रुळावरून घसरले, एकाचा मृत्यू तर 4 जण जखमी

Aprna
मुंबई

ओला-उबर १७ नोव्हेंबरपासून पुन्हा संपावर

News Desk

मुंबई | गेल्या १५ दिवसांपूर्वीच ओला उबर टॅक्सीचालकांनी तब्बल १२ दिवस संप पुकारला होता. ज्यामध्ये मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रातील ओला उबर टॅक्सीचालक सहभागी झाले होते. त्यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी चर्चा होऊनही कोणतेही ठोस निर्णय न झाल्याने टॅक्सीचालक-मालकांनी येत्या १७ नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा संपाची घोषणा केली आहे.

‘सरकारी पातळीवरील चर्चा होउनही आमच्या कोणत्याही मागण्या पूर्ण न झाल्याने, तसेच दोन ते तीन वेळा मीटींग घेऊन आश्वासन देउनही ओला, उबर कंपन्यांकडून कुठलेही आश्वासन पाळण्यात आले नाही. त्यामुळे आमच्यावर पुन्हा संप करण्याची वेळ आली आहे. यामध्ये १७ नोव्हेंबरपासून संप पुकारण्यात येईल तर १९ नोव्हेंबरला मंत्रालयावर मोर्चा काढणार आहोत, असे मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.

मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रात हा संप पुकारण्यार येणार आहे. तब्बल ६० हजार गाड्यांचे चालक मालक या संपात सहभागी होतील. ‘कॅब चालकांना चांगला परतावा मिळावा, ऑनलाईन कॅबचं किमान भाडं १०० ते १५० रुपये असावं, प्रति किलोमीटर १८ ते २३ रुपये भाडं लावावं’, अशा मागण्या ओला-उबर चालकांनी केल्या आहेत.

Related posts

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद

News Desk

विमानातून साडेचार कोटीचे सोने जप्त

News Desk

श्वान पथकच्या मदतीने वडाळा रेल्वे स्थानकाची तपासणी, रेल्वे पोलिसांना सतर्कतेचा इशारा

News Desk