HW News Marathi
महाराष्ट्र

अलिबागच्या किनाऱ्याजवळ दोघे बुडाले

अलिबाग : स्वातंत्र्य दिन आणि दहिकाल्यानिमित्त सुटी असल्याने मंगळवारी येथील समुद्र किनारी मौजमजा करण्यास आलेले रसायनीच्या होमडेकोर कंपनीतील दोन कामगार समुद्रात बुडाले. त्यांनाशोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सौरभ खान (२३), वृषभ सिवा (३५) अशी या दोघांची नावे आहेत.

एकूण पाच जण होमडेकोर कंपनीतून अलिबागला फिरायला आले होते. त्यापैकी सौरभ,वृषभ आणि सुरेश स्वामी (५६) हे तिघे जण किनाऱ्याजवळील कुलाबा किल्ल्यात फिरायला गेले होते. परतीच्या वेळी समुद्राला भरती आली. किल्ल्यातील लोकांनी त्यांना बाहेर न जाण्यास सांगितले. मात्रत्याकडे दुर्लक्ष करीत ते किनाऱ्याकडे निघाले आणि भरतीच्या वाढत्या पाण्यात सापडले. त्यांच्यातीलसुरेश स्वामीला पोहता येत असल्याने त्याने किनारा गाठला. मात्र अन्य दोघे वाहून गेले. किनाऱ्यावरील जीवरक्षकांच्या मदतीने त्यांना शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला, अद्याप त्यांचा थांगपत्ता लागू शकलेला नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“राज्याला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून शनी लागलाय”, व्हिडिओद्वारे रवी राणांची मुख्यमंत्र्यांवर टीका

Aprna

महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्रातच होईल, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार !

News Desk

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटक सत्र सुरू

News Desk
देश / विदेश

जलप्रलयातही देशप्रेम अबाधित!

News Desk

गुवाहाटी : दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत काल झालेले स्वातंत्र्यदिनाचे दिमाखदार कार्यक्रम आपण पाहिले. मात्र आसाममधील लहानशा शाळेसारखा सोहळा काल कुठेही झाला नसेल. पूरपरिस्थितीने वेढलेल्या आसाममध्ये चक्क गुडघाभर पाण्यात उभे राहून शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी ध्वजारोहण आणि ध्वजवंदन केले. जलप्रलयातही अबाधित राहिलेले हे देशप्रेम सध्या सोशल मिडियावर कौतुकाचा विषय ठरत आहे.

आसाममधील ढुबरी जिल्ह्यात फकीरगंज पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नसकारा सरकारी शाळेतील हे छायाचित्र असून येथील सहायक शिक्षक मिजानूर रहमान यांनी त्यांच्या फेसबुक प्रोफाइलवर टाकल्यानंतर काही तासांतच ते तब्बल ६० हजार जणांनी शेअर केले. सोशल मिडियावर मिळालेल्या या प्रतिसादाबद्दल रहमान यांनी देशवासियांचे आभार मानले आहेत. या निमित्ताने आसामसारख्या दुर्गम भागातील समस्यांना वाचा फुटल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ‘आम्हाला पायाभूत सुविधांपासूनही वंचित राहावे लागते. वीजेची समस्याही मोठी आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर लगेचच माझ्या मोबाइलची बॅटरी संपली आणि चार्ज करायला वीजही नव्हती. रस्ते आणि दळणवळणाच्या अन्य सुविधाही येथे आवश्यक प्रमाणात उपलब्ध नाहीत. याकडे शासनाने लक्ष पुरवावे,’ असे रहमान यांनी म्हटले आहे.

Related posts

इस्रोच्या ‘गगनयान’ मोहिमेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

News Desk

जितेंद्र आव्हाडांनी ‘त्या’ वादग्रस्तवर दिले स्पष्टीकरण

swarit

झारखंडमधूनही भाजप हद्दपार, शरद पवारांची टीका

News Desk