HW News Marathi
Covid-19

अमिताभजींना कोरोना,राजभवनात कोरोना ..आता तरी परिक्षांबाबत निर्णय घ्या !

मुंबई | कोरोनाकाळामध्येसुद्धा UGC ने पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्य परिक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमिवर महाराष्ट्रासोबतचं अनेक राज्यांनी ही परिक्षा घेणे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याचे सांगत परिक्षा रद्द करावी अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्र सरकारने या आधीच परिक्षा रद्द केल्याची घोषणा केली होती मात्र UGC आणि केंद्र सरकारच्या परिक्षा घेण्याच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थीसुद्धा संभ्रमात आहेत. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सुरूवातीपासुनच परिक्षा न घेण्याची ठाम भूमिका घेतली आहे. परिक्षा घेणं विद्यार्थ्यांच्या दृष्टीने किती धोक्याचं आहे हे सांगताना ते म्हणतात, “राजभवनात कोरोना ..अमिताभजींना कोरोना .. अश्या सुरक्षित ठिकाणी कोरोना पोहचू शकला .. आत्ता तरी HRD आणि UGC ला पटेल का.. की परीक्षा घेणं म्हणजे माझ्या विध्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणं आहे.. आत्ता तरी भूषण पटवर्धन महाराष्ट्राची बाजू मांडतील का ???”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशातील सर्व स्मारकं आणि संग्रहालय १६ जूनपासून खुली होणार!

News Desk

पुण्यात लागू नव्या नियमांवर भाजपला आक्षेप, सुचविले हे नवे पर्याय

News Desk

सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगावात २०० कोरोना सैनिक सज्ज

News Desk