HW News Marathi
महाराष्ट्र

“आमच्याकडून कुठलाही दबाव पोलिसांवर नव्हता”, उदय सामंतांनी दिलं स्पष्टीकरण!

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपशब्द काढल्याने त्यांच्या विरोधात शिवसेनेने तक्रार केली होती. त्यानुसार त्यांना अटक देखील झाली, मात्र काही तासातच जमीन देखील मिळाला. दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब यांचा केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेसाठी पोलिसांवर दबाव टाकण्याबाबतचा व्हिडीओ समोर आला होता. त्या व्हिडीओनंतर भाजपने परबांविरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी केली आहे. त्यानंतर आता शिवसेना अनिल परबांच्या पाठिशी उभी असल्याचं दिसतंय. खासदार विनायक राऊत यांच्यानंतर आता सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनीही अनिल परब यांची पाठराखण केली आहे.

आमच्याकडून कुठलाही दबाव पोलिसांवर नव्हता

उदय सामंत यांनी त्या विडिओ क्लिपबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, ” पर्सनल फोन येतात तेव्हा कुणाचा होता माहित नाही. पण आमच्याकडून कुठलाही दबाव पोलिसांवर नव्हता. त्या क्लीपची देखील माहिती घणे गरजेचे आहे, जमावबंदीचा आदेश हा जिल्हाधिकाऱ्यांचा आहे. सरकार किंवा पालकमंत्री म्हणून कुठलाही दबाव नाही. जनआशिर्वाद यात्रेचा कुठलाही राजकीय परिणाम कोकणात शिवसेनेवर होणार नाही. परवा घडलेल्या प्रकारात कशाप्रकारे यात्रा काढावी, काय बोलावे याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत”.

यात्रा आहे म्हणून मी कोकणात आहे असे नाही, मी बैठक आणि सामाजिक कार्यक्रमासाठी इथे आहे. जनआशिर्वाद यात्रा ही आशिर्वाद घेण्यासाठी असावी. मात्र याचा शिवसेनेवर परिणाम नाही, असा दावा उदय सामंत यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आल्याने सध्या राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आपत्तीजनक आणि समाजात तेढ निर्माण करणं विधान केल्याने नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक करण्यात आली. नारायण राणे यांना अटक करुन महाड कोर्टात हजर करण्यात आलं असता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. मात्र यामुळे भाजपा आणि शिवसेनेत मोठा वाद निर्माण झाला आहे.

दोन वेळा त्यांना फोन आल्याने पत्रकार परिषद थांबवली

यादरम्यान वाहतूक मंत्री अनिल परब यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अनिल परब पोलिसांना कोणताही उशीर न करता नारायण राणे यांना अटक करा असा आदेश देत आहेत. रत्नागिरीचे पालकमंत्री असणारे अनिल परब मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलत असताना दोन वेळा त्यांना फोन आल्याने पत्रकार परिषद थांबवली होती.

अनिल परब काय म्हणाले होते?

पत्रकार परिषदेत फोनवर बोलणाऱे अनिल परब यांचं संभाषण यावेळी तेथील माईकमुळे ऐकू येत होतं. पहिल्या कॉलनंतर अनिल परब यांनी पोलीस अधिकाऱ्याला दुसरा फोन लावला.”हॅलो तुम्ही लोक काय करत आहात? पण तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. तुम्ही त्यांना ताब्यात घेतलं आहे की नाही?….कोणती ऑर्डर ते लोक मागत आहेत? हायकोर्ट आणि सेशन्स कोर्टाने त्यांचा जामीन नाकारला आहे….मग पोलीस बळाचा वापर करा,” असं अनिल परब फोनवर बोलताना ऐकू येत होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपालांनी पुस्तक काढणे ही महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना – अस्लम शेख

News Desk

राज्यात काल 3,187 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 49 रुग्णांचा मृत्यू!

News Desk

जितेंद्र आव्हाड यांना कधी अटक होणार? किरिट सोमय्यांचा सवाल

News Desk