HW News Marathi
महाराष्ट्र

“अग्रलेखाची जबाबदारी या संजय राऊतची, रश्मी ठाकरेंची नाही!”

मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे त्यांच्या बिनधास्त आणि बेधक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. मात्र त्यांच्या याच बिनधास्तपणावरून त्यांना विरोधक सुनावत आहेत. दैनिक सामनाच्या अग्रलेखातील भाषेवरुन विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला आहे. सामनाच्या संपादक सौ. रश्मी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याच्या हालचाली असल्याची माहिती आहे. याचविषयी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ‘सामनाचा मी कार्यकारी संपादक आहे. त्या अग्रलेखाची जबाबदारी हा संजय राऊत घेतोय’, असं ते म्हणाले आहेत.

अग्रलेखांची जबाबदारी या संजय राऊतची… रश्मी ठाकरेंची नाही

सामना अग्रलेखाच्या वादातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच भाषेवर आक्षेप नोंदवत सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांच्याविरोधात भाजपच्या तक्रार नोंदविण्याच्या हालचाली सुरु आहेत. याचविषयी आज संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारलं असता राऊतांनी आक्रमक उत्तर दिलं. सामनाचा मी कार्यकारी संपादक आहे…. त्या अग्रलेखांची जबाबदारी या संजय राऊतची… रश्मी ठाकरेंची नाही, असं राऊत म्हणाले आहेत.

ते महाराष्ट्रात येऊन केवळ बेताल बडबड करतात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद दिले आहे. केंद्रीय सूक्ष्म, मध्यम आणि लघूद्योग खात्यासाठी नारायण राणे यांनी चांगले काम करुन देश पुढे न्यायला हवा. पण ते महाराष्ट्रात येऊन केवळ बेताल बडबड करणार असतील तर शिवसेनेकडून त्याला प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. महाराष्ट्राच्या राजकारणात विधायक टीकेची परंपरा आहे. तशी टीका झाल्यास शिवसेना त्याचे स्वागत करेल, असेही राऊत यांनी सांगितले आहे.

आयपीसी कलम १५३ (अ), १०७ आणि २१२ सहीत सायबर गुन्ह्यांखाली तक्रार दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या विरोधात भाजपने तक्रार केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी राणेंनी वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी शिवसेनेचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यावरून राणे यांच्याविरुध्द जातीय तेढ निर्माण करणे, द्वेष निर्माण करणे अशा विविध कलमांन्वये सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याच साबर पोलीस स्थानकामध्ये आता उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि वरुन देसाईंविरोधात तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे.

वरून सरदेसाई यांनी मुंबईमधील राणेंच्या घऱाबाहेर आंदोलन केलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यावर देसाई यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. याचं फेसबुकवरुन लाइव्ह प्रक्षेपण करण्यात आल्याने आयपीसी कलम १५३ (अ), १०७ आणि २१२ सहीत सायबर गुन्ह्यांखाली तक्रार दाखल करुन घेण्यात यावी असं म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागपूरात भीम आर्मीच्या मेळाव्याला कठोर अटींसह परवानगी

swarit

“आम्ही सरकारमुळे नाही…”, नाना पटोलेंच्या वक्तव्याची जयंत पाटलांकडून पाठराखण

News Desk

मलिकांच्या राजीनाम्याबद्दल छगन भुजबळाचे मोठे विधान

Aprna