HW News Marathi
महाराष्ट्र

नितीश कुमारांनी बिहारमध्ये सत्ता स्थापन करताना शरद पवारांचा सल्ला घ्या – उदय सामंत

मुंबई | बिहारमधील विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून १२५ जागांवर विजय मिळाला आहे. बिहार निवडणुकीत भाजपा मोठा भाऊ ठरला आहे. दरम्यान नितीश कुमार यांनी बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न राबवावा असा सल्ला राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना दिला आहे. नितीश कुमार यांनी बिहारमध्ये सरकार स्थापन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा सल्ला घ्यावा असंही ते म्हणाले आहेत.

उदय सामंत यांनी यावेळी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांचं कौतुक केलं. त्यांनी दिलेली झुंज कौतुकास्पद असल्याचं ते म्हणाले आहेत. पुढे ते म्हणाले की, “बिहारमध्ये सरकार स्थापन करताना नितीश कुमार यांनी शरद पवार यांचा सल्ला घेतला आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासारखं खंबीर नेतृत्व केलं तर राज्यातील महाविकास आघाडीसारखा पॅटर्न बिहारमध्येही निर्माण होऊ शकतो”.

याआधी देवेंद्र फडणवीस यांना जेव्हा बिहारचा महाराष्ट्र होईल का? असं विचारण्यात आलं होतं तेव्हा ते म्हणाले होते की, “दोन्ही वेगळी राज्यं आहेत. बिहारमध्ये बिहारचाच पॅटर्न चालणार. नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीएचं सरकार होईल. नितीश कुमार मुख्यमंत्री होतील. भाजपा त्याला पूर्ण समर्थन देईल”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘लव्ह जिहाद’ निवडणूक प्रचाराचा मुद्दा होऊ शकत नाही! – डॉ. नीलम गोऱ्हे

News Desk

शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जदाता झाला पाहिजे! – नितीन गडकरी

News Desk

लॉकडाऊनचा निर्णय अन्यायकारक,अजित पवारांच्या सूचनेनुसार घाट, विखेंचा आरोप!

News Desk