HW News Marathi
व्हिडीओ

SC कडून अर्णबला दिलासा, तर ठाकरे-नाईक कुटुंबात आर्थिक व्यवहार झाल्याचा सोमय्यांचा आरोप

अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन मिळाला आहे. अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेत असेलेल्या रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या जामीनाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू होती.

तर दुसरीकडे अन्वय नाईक प्रकरणावरुन राज्यात नवा वाद उभा राहिला आहे. याच प्रकरणावरून भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक कुटुबांतील व्यवहारावरून गौप्यस्फोट केला आहे. या जमीन व्यवहारात मनिषा रवींद्र वायकर यांचंही नाव सोमय्या यांनी घेतलं आहे.

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अन्वय नाईक परिवाराशी आर्थिक व व्यावसायिक संबंध होते, आहेत. ते का लवण्यात आले. रश्मी उद्धव ठाकरे, मनिषा रवींद्र वायकर यांनी रायगड जिल्ह्यातील कोलेई (ता. मुरूड) येथे अन्वय मधुकर नाईक, अक्षदा अन्वय नाईक यांच्याकडून जमिनी घेतल्या. उद्धव ठाकरे, तुम्ही यासाठी अर्णब गोस्वामींना लक्ष्य करत आहात का?,” असा गंभीर आरोप सोमय्या यांनी ठाकरे कुटुबांवर केला आहे.

#ArnabGoswami #ArnabGetsBail #UddhavThackeray #AnvayNaik #KiritSomaiyya #MVA #RashmiThackeray #MahaVikasAghadi #AshishShelar #RamKadam #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवार-शाहू छत्रपतींची भेट ! महाराष्ट्रात राजकीय वादळाची चाहूल?

News Desk

Sharad Pawar यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या Ketaki Chitale चं Sadabhau Khot यांनी केलं समर्थन

News Desk

अजित पवार आणि बच्चु कडूंनी रावसाहेब दानवेंचा घेतला खरपूस समाचार!

News Desk