HW News Marathi
महाराष्ट्र

उदयनराजेंनी राजीनामा देऊन तेथील लोकांना त्रास देऊ नये !

सातारा | लोकसभा निवडणुकांदरम्यान देशात निर्माण झालेल्या ईव्हीएमविरोधी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर “जे व्हायचे ते होऊ दे, मी राजीनामा देतो. सातारा मतदारसंघातील निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या”, असे साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले होते. त्यावर “उदयनराजेंनी राजीनामा देऊन तेथील लोकांना त्रास देऊ नये”, असे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. तसेच, “उदयनराजे तुम्ही जरी शरद पवारांबरोबर असलात तरी मनातून आमच्यासोबतच आहात, हे मला माहित आहे”, असेही रामदास आठवले यांनी केले आहे. रामदास आठवले पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

“ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानानंतर मतमोजणीमध्ये अनेक मतदारसंघामध्ये झालेले मतदान आणि मोजलेल्या मतांमध्ये मोठी तफावत आढळली आहे. तरीही निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय याबाबत कोणतेही भाष्य करत नाही. हा लोकशाहीचा घात आहे. जे व्हायच ते होऊ दे, मी राजीनामा देतो. सातारा मतदारसंघातील निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या”, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले होते. “निवडणूक आयोगाला जर ईव्हीएम एवढी सुरक्षित व तांत्रिकदृष्ट्या सक्षम वाटत असतील तर त्यांनी झालेले मतदान व मोजलेल्या मतदानात देशभरात जी तफावत आली त्याबाबत खुलासा केला पाहिजे”, अशी मागणी देखील उदयनराजे यांनी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईचे सहपोलीस आयुक्त एका बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात? भाजपचा सवाल 

News Desk

देशाच्या फाईव्ह ट्रिलीयन डॉलरमध्ये महाराष्ट्राचा वाटा वन ट्रिलीयन डॉलरचा- मुख्यमंत्री

News Desk

राज्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालातील महत्त्वाच्या बाबी

swarit