HW News Marathi
Covid-19

पुणेकरांना दिलासा! सोमवारपासून मॉल्स उघडणार तर दुकाने ७ पर्यंत सुरु राहणार 

पुणे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना मोठा दिलासा दिला आहे. सोमवारपासून (१४ जून) पुण्यातील सर्व मॉल्स उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर सर्व दुकानं रात्री ७ वाजेपर्यंत खुली राहतील. याशिवाय सोमवारपासून अभ्यासिका, वाचनालय सुरु करण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे. पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट पाचच्या खाली आला प्रशासन लगेच निर्बंध बदलेल. तर रेस्टटोरंट आणि हॉटेल्स रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असंही अजित पवार यांनी सांगितलं आहे. आज (११ जून) पुण्यात अजित पवार बोलत होते.

अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील कौन्सिल हॉल इथे कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीला प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. शहर अनलॉक केल्यानंतर ही पहिली बैठक होती. रुग्ण संख्येची परिस्थिती बघून आणखी शिथिलता देणार की निर्बंध कठोर केले जाणार याकडे लक्ष लागलं होतं. या बैठकीनंतर पुणेकरांना निर्बंधांमध्ये आणखी शिथिलता मिळाली आहे.

सोमवारपासून हे नवीन नियम लागू केले जाणार आहेत. मात्र, सोमवारपासून ही परवानगी देण्याआधी राज्य सरकारने ठरवून दिलेल्या निकषाचाही विचार केला जाणार आहे. त्याबद्दलही अजित पवारांनी स्पष्ट भूमिका मांडली. “सोमवारपासून या परवानग्या दिल्या जाणार असल्या, तरी पॉझिटिव्हीटी रेट बघितला जाणार आहे. पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांच्या आत असेल, तर हे चालू केलं जाईल, अन्यथा निर्णय बदलावा लागेल. त्यामुळे माझं पुणेकरांना आवाहन आहे की, त्यांनी नियमांचं पालन करावं, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

तसेच, आषाढी वारीसाठीदेखील १० मानाच्या पालख्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने आषाढी वारीसाठी एक समिती स्थापन केली होती. या समिती अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, आषाढी वारीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने विचार करुन हे सांगतिलं आहे. त्यामुळे या वारीला १० मानाच्या पालख्यांना २० बसेस दिल्या जाणार आहेत. यावेळी कोरोना नियमांचं पालन करणं गरजेचं असणार आहे असं अजित पवारांनी सांगितलं आहे. तसेच, भाविकांसाठी मंदिर बंद राहणार असंही त्यांनी सांगितलं आहे. तसेच, देहू आळंदी पालखीबरोबर १०० भाविकांना परवानगी देण्यात आली आहे.

१० मानाच्या पालख्या कोणत्या?

१- संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी)

२- संत तुकाराम महाराज (देहू)

३- संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर)

४- संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर)

५- संत सोपान काका महाराज (सासवड)

६- संत नामदेव महाराज (पंढरपूर)

७- संत एकनाथ महाराज पैठण

८- रुक्मिणी माता (कौडानेपूर) अमरावती

९- संत निळोबाराय (पारनेर अहमदनगर)

१०- संत चांगटेश्वर महाराज (सासवड)

पायी जाण्यास मज्जाव, रिंगण-रथोत्सावाला अटींवर परवानगी

वारीला पायी जाण्यास परवानगी देण्यात आली नाही. पालखी पायी गेल्यास लोक उत्साहाच्या भरात पालखीभोवती गर्दी करतील. त्यामुळे कोरोना नियमांचा भंग होऊ शकतो. कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळेच पायी जाण्यास देण्यात आली नाही, असं ते म्हणाले आहेत.

भाविकांसाठी विठ्ठल मंदिर बंद

दरम्यान, भाविकांसाठी विठ्ठल मंदिर बंद राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. केवळ मानाच्या पालख्यांमधील वारकरीच मंदिरात जाऊ शकतील. रिंगण आणि रथोत्सवाला निर्बंधासह परवानगी देण्यात आली आहे, असं सांगतानाच इतरांना परवानगी नाही. त्यामुळे कुणीही गर्दी करू नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील कापूस खरेदी १५ जूनपर्यंत करावी !

News Desk

“महाविकासआघाडी सरकारमध्ये शिवसेनेला काय मिळालंय?” भाजपच्या संजय काकडेंचा टोला

News Desk

राज्यात ११,८१३ नवे रुग्ण तर मुंबईत ७९ टक्के रिकव्हरी रेट

News Desk