HW News Marathi
महाराष्ट्र

माधवी वैद्य ,जयश्री काळे यांच्या व्याख्यानातून उलगडले अपरिचित ‘विंदा ‘ !

पुणे | ‘रसिक मित्र मंडळा’च्या ‘एक कवी-एक भाषा’ मासिक व्याख्यानमालेचे आयोजन शुक्रवार सायंकाळी पुणे येथील पत्रकार भवन, गांजवे चौक येथे करण्यात आले होते. ज्ञानपीठ विजेते श्रेष्ठ कवी ,उत्तम खवैय्ये ,दानशूर लेखक ,तरुण पिढीला नोकरीची जागा मिळावी म्हणून ५२ व्या वर्षी प्राध्यापकीचा राजीनामा देणारा सहृदय व्यक्ती ,सुतारकामाचा छंद जोपासणारा अवलिया अशी विंदा करंदीकरांची अनेक रूपे या कार्यक्रमात उलगडली.

यावेळी ​’​अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्ष डॉ.माधवी वैद्य आणि विंदांच्या कन्या जयश्री काळे यांनी या कवी विंदा करंदीकर यांचा जीवनप्रवास उलगडला. व्याख्यानादरम्यान डॉ.माधवी वैद्य यांनी तयार केलेली विंदा करंदीकर यांच्या काव्यवाचनाच्या दृकश्राव्य ध्वनिचित्रफीती दाखविण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विंदा करंदीकर यांची कन्या जयश्री काळे होत्या​.​

‘एक कवी -एक भाषा’ मासिक व्याख्यानमालेचे हे ५५ वे पुष्प होते . ‘रसिक मित्र मंडळ’ चे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला यांनी डॉ माधवी वैद्य आणि जयश्री काळे यांचा सत्कार केला तर प्रदीप निफाडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘बलात्कार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा’, नवाब मालिकांची गृहमंत्र्यांकडे मागणी

News Desk

संभाजीनगर नव्हे ‘छत्रपती संभाजीनगर’; औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामकरणास शिंदेंची मान्यता

Manasi Devkar

पुन्हा रेल्वे अपघात; दुरांतो एक्स्प्रेसचे ९ डब्बे घसरले

News Desk
मुंबई

१०० दिवस उलटले तरी मृतदेह जेजे रुग्णालयात

News Desk

मुंबई | धारावी येथे २१ जुलैला सचिन जैसवाल वय १७ वर्ष मुलाचा मृत्य झाला होता. त्याचा मृत्यू हा पोलिसांनी केलेल्या मारहाणीतून झाला आहे, असा आरोप मृत मुलाच्या घरच्यांनी केला आहे. आज १०० दिवसापेक्षा अधिक दिवस होऊन गेले त्याचा मृतदेह जेजे रुग्णालयात पडून आहे.परंतु त्याचा घरच्यांनी अजुनही मृतदेह हाती घेतला नाही.कारण मुलाचा मृत्यू हा पोलिसांनी केलेल्या मारहाणीतुन झाला आहे व जो पर्यंत संबंधित पोलिसांवर कारवाई होत नाही तो पर्यंत मृतदेहाला हात लावणार नाही असे मृत सचिन जैस्वाल याचा घरच्यांनी सांगितले.

१२ जुलै रोजी मोबाईल चोरी प्रकरणी सचिन जैस्वाल याला संशयावरून ताब्यांत घेतले होते २२ तास चौकशी नंतर त्याला पोलिसांनी सोडल होते. त्यानंतर १३ जुलै रोजी त्याला ताप व अंगदुखी झाली तेव्हा शेजारचा दवाखान्यात नेले होते. १५ जुलै रोजी रक्ताची उलटी आल्यामुळे सायन रुग्णालयात पुन्हा दाखल केले तिथे अतिदक्षता विभागात ५ दिवस सचिनला ठेवण्यात आले आणि मग तेथेच त्याचा मृत्यु झाला .

पोलिसांनी २२ तास केलेल्या चौकशीत सचिनला पोलसानी बेदम मारले असं स्वतः ता त्याने घरी येताच घरच्यांना सांगितले होते.त्यामुळेच त्याला अंगदुखी व ताप आला होता. तो या गुन्ह्यात नसताना देखील त्याला संवषयावरून नेऊन विचारांना करून मारधाड केली त्यामुळे तो घाबरून आजारी पडला व त्याचा मृत्यू झाला असा दावा घरचे करत आहेत. परंतु डॉक्टरानी दिलेल्या रिपोर्ट मध्ये त्याला लॅपटो स्पायरेसिस झाल्याचे आढळले आहे. त्यानेच तो आजारी पडून मृत्यु झाला आहे असे पोलीस व डॉक्टरांकडून स्पष्ट झाले आहे.

परंतु जैस्वाल कुटुंबांचे म्हणणे असे आहे की आमचा मुलगा इतके दिवस ठणठणीत होता. पोलिसांनी केलेल्या मारहानीमुळे त्याची तब्यत खालावली आणि मृत्यू झाला. पोलिसांनी डॉक्टरांशी संपर्क करून हे खोटे रिपोर्ट बनवले आहेत. जर पोलिसांनी काही केलं नाही मग आम्ही त्यांचा विराधात इतक्या केलेल्या कॉम्प्लेइंट वरिष्ठ का ? नोंदवत नाहीत. या केस बद्दल पोलिसांची प्रतिक्रिया घ्यायला गेले असता कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.

Related posts

माहुलवासीयांच्या पुनर्वसनाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष

News Desk

पुण्यात २१ कुत्र्यांचे हत्याकांड

News Desk

शिक्षक मतदार संघात बोगस मतदारांवर होणार कारवाई

News Desk