HW News Marathi
महाराष्ट्र

एसटी महामंडळाला १५ कोटीचे नुकसान, कर्मचाऱ्यांचा आजही संप सुरुच

मुंबई | उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी गेलेले लोक पुन्हा घरी परत येण्यासाठी एसटी बस उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. एसटी महामंडळाचे कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढ मान्य नसल्यामुळे गुरुवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत.

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाला १५ कोटी रुपयाचा महसूल बुडाला आहे. एसटीच्या २५ हजार फेऱ्या रद्द झाल्या आहेत. दिवसभरात महाराष्ट्रातील २५० आगारातून सुमारे ३० टक्के बसेसच्या फेऱ्या सुटल्या, तर राज्यातील २५ आगार पूर्ण क्षमतेने चालू होते.

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यात संपाचा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवला. एसटी कर्मचाऱ्यांच्या अचानक संपावर गेल्यामुळे प्रवाशांचे आजही हाल होणार आहेत. त्यामुळे एसटी प्रशासाने कर्मचाऱ्यांवर कारवाई करत राज्यातील शेकडो कर्मचाऱ्यांचे निलंबन करुन संप मोडीत काढण्याचा प्रयत्न केला.

संपावर जाण्याआधी कोणतेही अधिकृत पत्र कर्मचाऱ्यांनी दिले नाही. तर काही ठिकाणी कर्मचारी गैरहजर राहिले. संप करुन प्रवाशांना वेठीस धरणे चुकीचे असून कर्मचाऱ्यांना वेतन मान्य नसेल तर त्यांनी औद्योगिक न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा असल्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी म्हटले आहे.

  • संबंधित बातम्या

एसटी संपाला भोकर तालुक्यात हिंसक वळण

एसटी कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘किरीट सोमय्या आता पाहणीसाठी जाणार बारामतीत’,सोबतीला पडळकरही!

News Desk

धक्कादायक ! मुंबईमध्ये ३ दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण

swarit

बेपत्ता नगररचनाकार करपेंच्या 39 बांधकाम परवान्यांची होणार चौकशी

News Desk