HW News Marathi
महाराष्ट्र

पुणे महापालिकेचा पाणीकपातीचा निर्णय

पुणे | पुणे शहराला दररोज सुमारे सोळाशे एमएलडी पाण्याची आवश्यकता असताना केवळ साडे अकराशे एमएलडी पाणी पुरवठा करण्याचा निर्णय कालवा बैठकीत झाला आहे. पुण्यात सध्या मध्यवस्तीत दोन वेळा तर उपनगरात एक वेळा पाणी पुरवठा होत आहे. परंतु आता पुण्यात पाणीकपात सुरु केली जाणार असून पुणेकरांकडे दिवसातून एकदाच पाणी येणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. येत्या आठवड्यात पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक तयार करून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत खडकवासला कालवा समितीची बैठक झाली. या बैठकीत पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे आणि उपस्थित एकाही आमदाराने याबाबत आक्षेप किंवा विरोध नोंदवला नाही. खडकवासला धरण साखळी सोडून इतर कोठेही धरणात पुरेसे पाणी नसल्यामुळे जलसंपदा खात्याने हा निर्णय घेतल्याचे यावेळी सांगितले जात आहे.

पुण्यातील पाणी कपातीच्या निर्णयानंतर सर्व शहरात दिवसातून एकाच वेळी पाणी पुरवठा केला जाऊ शकतो, असे महापालिकेच्या अधिकाऱ्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आयुक्त सौरभ राव संध्याकाळी याबाबत पुण्यात आल्यानंतर प्रशासनाची भूमिका अधिकृतपणे जाहीर करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाराष्ट्रात अगदी योग्य वेळी आपली सत्ता आली !

swarit

अमृता फडणवीस पुन्हा एकदा सोशल मीडियावर झाल्या ट्रोल, अर्थसंकल्पाच्या ‘त्या’ ट्विटवर नेटकऱ्यांनी केले टार्गेट

News Desk

मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगडसह राज्यभरात मुसळधार पावसाची हजेरी

Aprna
महाराष्ट्र

दसऱ्यानंतर उद्धव ठाकरे जाणार अयोध्येला 

swarit

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांकडून राम मंदिर निर्माणाच्या विषयाचे मोठ्याप्रमाणात राजकारण केले जात आहे. प्रत्येकजण राम मंदिर निर्माण संबंधी मोठ-मोठी विधाने करुन चर्चेत राहत आहेत. शिवसेनेच्या प्रयत्नाशिवाय राम मंदिराची उभारणी होणार नाही, असे विधान राम जन्मभूमी न्यासच्या प्रमुखांनी केले आहे .

अयोध्येतील श्रीराम मंदिर न्यायासाचे अध्यक्ष जनमेयशरणजी महाराज यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. तसेच त्यांना अयोध्येला येण्याचे आमंत्रण दिले असून उद्धव ठाकरे यांनी अयोध्याला जाण्याच्या आमंत्रण स्वीकारले आहे. ठाकरे आपल्या शिवसैनिकांसह दसऱ्यानंतर राम मंदिराच्या उभारणीसाठी अयोध्याला भेट देणार आहेत. अयोध्याला जाण्याची तारीख दसऱ्याच्या मेळाव्यात कळेल, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपले विधान व्यक्त केले आहे.

Related posts

राष्ट्रवादीसारख्या पक्षाचे पाठबळ मिळत असेल, तर नक्कीच चांगलं काम करु शकेन- प्रिया बेर्डे

News Desk

‘गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र!’

News Desk

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेनंतर पुढची दिशा काय असेल यावर ॲड.असिम सरोदे यांची Exclusive माहिती!

News Desk