HW News Marathi
महाराष्ट्र

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पूर्ण केली ६ वर्षीय संचितची इच्छा!

वाळवा। अनेकदा आपल्या कृतींच्या माध्यमातून राजकीय नेते लोकांची मने जिंकत असतात. आणि आज याचाच प्रत्यय पाहायला मिळाला. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आपल्या अशाच एका कृतीच्या माध्यमातून लोकांची मने जिंकली आहे.आज सकाळीच वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी ते बावची रस्ता, आष्टा- दुधगाव रस्ता, बागणी – ढवळी – बहादूरवाडी रस्ता, ढवळी ते कोरेगांव दरम्यान दोन लहान पुल, नागाव – भडखंबे – बहादूरवाडी फाटा रस्ता या विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला.

साहेब… मी पण फोडू का नारळ ?

वाळवा तालुक्यातील भडखंबे येथे हा कार्यक्रम सुरू असताना ६ वर्षीय संचित गावडेही त्यावेळी तिथे उपस्थित होता. आपल्या गावातील मोठी मंडळी नारळ फोडतानाचे पाहून चिमुकल्या संचितलाही मोठे कुतूहल वाटले. मोठी हिम्मत करुन करून संचित, मंत्री जयंतरावांकडे आला आणि म्हणाला साहेब… मी पण फोडू का नारळ ? चिमुकल्या निरागस मन पाहत जयंतरावांनी लागलीच त्याची इच्छा पूर्ण केली. नारळ फोडतानाचे संचितचे स्मित हास्य पाहण्याजोगे होते असे जयंतराव म्हणाले.दरम्यान मंत्री जयंतरावांनी कालपासून इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात दोन दिवसात तब्बल, ४१ कोटी रुपयांचा विकास कामांचा शुभारंभ करत धडाका लावला आहे.

राजकारण हा फार सिरीयस बिझनेस आहे

आज मी आणि जयंत पाटील एकाच व्यासपीठावर आलो किंवा एका गाडीत दिसलो त्याचा वेगळा अर्थ घेऊ नये. राजकारण हा फार सिरीयस बिझनेस आहे. कुणी काय बोलले यावर लगेच अंदाज बांधू नये’, असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. ते आज धुळ्यात बोलत होते.ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि सहकार महर्षी पी.के आण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री के सी पाडवी, माजी मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल उपस्थित आहेत. महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि मंत्री जयंत पाटील हे या कार्यक्रमासाठी एकाच गाडीतून आले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु होती.

देवेंद्र फडणवीस आणि मंत्री जयंत पाटील हे या कार्यक्रमासाठी एकाच गाडीतून

आज मी आणि जयंत पाटील एकाच व्यासपीठावर आलो किंवा एका गाडीत दिसलो त्याचा वेगळा अर्थ घेऊ नये. राजकारण हा फार सिरीयस बिझनेस आहे. कुणी काय बोलले यावर लगेच अंदाज बांधू नये’, असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. ते आज धुळ्यात बोलत होते.ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि सहकार महर्षी पी.के आण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री के सी पाडवी, माजी मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल उपस्थित आहेत. महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि मंत्री जयंत पाटील हे या कार्यक्रमासाठी एकाच गाडीतून आले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा”, राज ठाकरेंकडून केतकी चितळेच्या पोस्टचा निषेध

Aprna

“इंटर्व्हलनंतरची स्टोरी मी सांगतो”, NCB प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा

News Desk

ज्या क्षणी ठाकरे सरकार सांगेल त्या क्षणी लोकल सुरु करण्याचं रावसाहेब दानववेंचं महत्त्वपूर्ण विधान!

News Desk