HW News Marathi
Covid-19

तासगावच्या द्राक्ष उत्पादकांसाठी जयंत पाटील यांचा अनोखा पॅटर्न

मुंबई | फळपीक विमा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आज (६ मे) मंत्रालयात मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक पार पडली. तासगावच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा अवगत करण्यासाठी जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी थेट उपसमितीच्या बैठकीतच शेतकऱ्यांना फोन लावला. जयंत पाटील यांच्या या कृतीने मंत्रिमंडळाच्या उपसमित्याच्या बैठकीत एक वेगळाच पॅटर्न बघायला मिळाला.

दरम्यान द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आपले मत मांडताना आधी महापूर मग अतिवृष्टीनंतर अवकाळी पाऊस आणि आता कोरोना या सगलच्या संकटांमुळे किती नुकसान झाले याची व्यथा मंत्रिमंडळाच्या उपसमितीसमोर मांडली. समितीने शेतकऱ्यांचे मत जाणून घेतले.

फळपिके हे बहुवार्षिक असल्याकारणाने फळपिकांना वर्षभर संरक्षण मिळावे अशी भूमिकाही जयंत पाटील यांनी या बैठकीत मांडली. तसेच स्ट्रॉबेरी उत्पादकांना विम्यासाठी प्रायोगिक तत्वावर योजना राबविण्यात यावी असे मतही त्यांनी या बैठकीत मांडले. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फळपिक विमा योजनेचा लाभ मिळावा यासाठी महाविकासआघाडी सरकार प्रयत्न करणार असे आश्वासन जयंत पाटील बैठकीनंतर दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“काही राज्यात निवडणुका असतानाही तिथे रुग्णसंख्या कमी”, फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोमणा  

News Desk

“कोरोनाच्या तिसरी लाटेत लहान मुलांची काळजी कशी घ्याल ?”, मुख्यमंत्री म्हणाले…

News Desk

राज्यात आज १५ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk