HW News Marathi
महाराष्ट्र

अजित दादा ,आम्ही पण पाटील आहोत !चंद्रकांत पाटलांनी ठणकावलं !

मुंबई | महाराष्ट्रात सध्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचे वारे वाहतायत. प्रचार,टिका-टिप्पणी,राजकीय संघर्ष याला ऊत आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकार बदलणारा जन्माला यायचा असे वक्तव्य काल पंढरपूरात केले,याला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सौ चूहे खा के बिल्ली चली हज को, कुणीही मुख्यमंत्री झाले तरी आपणच उपमुख्यमंत्री कसे ? असा प्रश्न त्यानी अजित पवारांना विचारला आहे.

आम्ही सुद्धा पाटील आहोत,अजित पवार इतका अहंकार बरा नव्हे. इंदिरा गांधी सुधा पराभूत झाल्या होत्या. ही भाषा बरोबर नाही. हम किसिको टोकेंगे नही. टोकेंगे तो छोडेंगे नहीं,असे पाटील म्हणाले.

अजित पवारांना पराभव दिसतोय !

अजित पवार यांना पराभवाची लक्षणे दिसल्याने मोठ्या साहेबांकडून(शरद पवार) शिकलेल्या गोष्टी करत आहेत. तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे,जीभ कशाला घसरवता. आम्ही पण पाटील आहोत तसल नाही चालायचं महाराष्ट्र आहे हा,बेबंद शाही नाही! अशा पद्धतीने पाटील यांनी अजित पवारांना सल्ला दिला आहे.

आता अजित पवारांवर मी अभ्यास कऱणार

“मला कधी कधी आश्चर्य वाटतं. शरद पवारांवरील माझी पीएचडी अद्याप अपूर्ण आहे. पण आता अजित पवारांवर मी अभ्यास कऱणार आहे. त्यासाठी मी काही प्राध्यापकांना भेटणार आहे. इतके सगळे प्रकार करुनही छातीठोकपणे कसं बोलतात याचा अभ्यास मी करणार आहे. म्हणजे यांच्यावर सिंचनच्या केसेस, राज्य सहकारी बँकेची चौकशी संपलेली नाही”.

“महाराष्ट्रात जो कारखाना बंद पडेल तो हे विकत घेणार. पवार कुटुंबाचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष किती साखर कारखाने आहेत याची श्वेतपत्रिका काढली पाहिजे. इतकं केल्यानंतरही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर हे उपमुख्यमंत्री, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरही हे उपमुख्यमंत्री….उद्या येणार नाही पण कम्युनिस्टांचं राज्य आलं तरी हेच उपमुख्यमंत्री”, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना सुनावले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलीस दलाच्या अत्याधुनिक कार्यपद्धतीमुळे जनमानसात पोलीसांप्रति विश्वासार्हता! – जयंत पाटील

Aprna

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे यांचे उपोषण मागे

swarit

मुख्यमंत्र्यांची परवानगी न घेता परमबीर सिंह गायब, गृहमंत्री वळसे पाटील यांचे वक्तव्य!

News Desk