HW News Marathi
महाराष्ट्र

केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात आमचा बळी जातोय, ईडीच्या कारवाईवरून सरनाईकांचं वक्तव्य!

ठाणे। ईडीकडून होत असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मोठं विधान केलं आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या भांडणात आमचा बळी जात आहे, असा घरचा आहेरच प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारला दिला आहे. प्रताप सरनाईक यांनी मीडियाशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणामुळे आमचा बळी जात आहे हे मी पूर्वीपासून सातत्याने मीडिया समोर बोलत आलो आहे. मग प्रताप सरनाईक असो की अन्य कोणी? आरोप-प्रत्यारोप होत असतात. विरोधक त्यांचे काम करत असतात, असं सांगतानाच मी किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटींचा दावा दाखल केला आहे. ते चुकीचा मेसेज पसरवत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर दावा केला आहे. आमचा न्यायालयावर विश्वास आहे. न्यायालय जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल, असं सरनाईक म्हणाले.आम्ही राजकारण करत असताना राजकीय पक्षांना अंगावरही घेतो. मात्र त्यात कुणाच्या कुटुंबीयांना आणत नाही. आता आमच्या कुटुंबीयांवरही घाव घातला जात आहे. त्यांनाही प्रकरणांमध्ये गोवले जात आहे. त्याचा कुटुंबीयांना त्रास होत असतो, असं त्यांनी सांगितलं.

ईश्वरावर प्रचंड श्रद्धा आहे, परंतु अशा संकटात मंदिरे उघडली तर…

यावेळी त्यांनी मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. मंदिरे उघडावी ही सर्वसामान्यांची इच्छा आहे. अनेकांची देवावर श्रद्धा आहे. तुमची देवावर श्रद्धा आहे मग मुख्यमंत्र्यांची श्रद्धा नाही का? असा सवाल करतानाच मुख्यमंत्र्यांची ईश्वरावर प्रचंड श्रद्धा आहे. परंतु, अशा संकटात मंदिरे उघडली तर तिसऱ्या लाटेला आयतच निमंत्रण मिळेल. त्यामुळे देव्हाऱ्यात देवाची पूजा करावी. मंदिरे उघडण्यासाठी काही काळ प्रतिक्षा करावी, असं सांगतानाच आज ना उद्या शाळाही उघडतील. याबाबत सरकार आणि लवकर तोडगा काढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

लवकरात लवकर कोरोना नाहीसा होवो अशी मागणी गणरायाकडे मागणी

गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही गणेशोत्सव साजरा करत आहोत. इको फ्रेंडली मूर्तीच्या माध्यमातून पर्यावरण पूरक असा गणेश उत्सव आम्ही सहकुटुंब साजरा करतो. जगातून, राज्यातून आणि शहरांतून लवकरात लवकर कोरोना नाहीसा होवो अशी मागणी गणरायाकडे मागणी केली आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.यावेळी त्यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्द्यावरही भाष्य केला. 12 आमदारांचा प्रश्न हा राज्यपालांकडे आहे. त्याचबरोबर या प्रकरणात कोर्टाने हस्तक्षेप केला आहे. कोर्टाने तसं मत देखील मांडलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर राज्यपाल 12 आमदार नियुक्ती बाबत विचार करतील अशी आशा आहे, असंही ते म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बुलडाण्यात ३ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत वाढ

News Desk

#CoronaVirus : राज्यातील ‘ही’ चार शहरे येत्या ३१ मार्चपर्यंत बंद राहणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

swarit

अखेर कोल्हापूरला मिळाले ‘हे’ नवे पालकमंत्री

News Desk