HW News Marathi
देश / विदेश

राज्यात एकत्र आहोत, केंद्रातही असायला हवं ! काँग्रेसने शिवसेना आणि राष्ट्रवादीला सुनावलं

मुंबई | लोकसभा आणि राज्यसभेत प्रचंड गदारोळानंतर भाजप सरकारने केंद्रात कृषी विधेयके मंजूर करून घेतली.या विधेयकांना विरोध करताना काँग्रेस प्रचंड आक्रमक झाली काही खासदाराचं निलंबनही करण्यात आलं. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका संशयास्पद राहिली.शिवसेनेत लोकसभेत या विधेयकाला पाठिंबा दिला तर राज्यसभेत विरोध केला.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या विधेयकाच्या मंजुरीच्या वेळी अनुपस्थित राहिले.

महाविकासआघाडीचं सरकार राज्यात असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची केंद्रातील दुटप्पी भूमिका काँग्रेसला रूचलेली नाही. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी या मुद्द्यावरुन सूचक विधान केलं आहे. ‘शेतकरी गळचेपी होत आहे आणि मध्यस्तांचा फायदा होतोय, याला काँग्रेसचा विरोधच आहे. पण शिवसेना आणि राष्ट्रवादीने सभात्याग का केला ते त्यांनाच विचारा. राज्यात आम्ही एकत्र आहोत, केंद्रातही एकत्र असायला हवं होतं. शेतकरी हितासाठी काँग्रेस लढत आहे, तिथे सगळ्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांचे हात मजबूत केले पाहिजेत,’ असं अशोक चव्हाण म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तामध्ये भारतीय दूतावास कार्यालयातील दोन अधिकारी बेपत्ता

News Desk

रश्मी शुक्लांचा जबाब अखेर नोंदवला, मुंबई पोलिसांची टीम हैदराबादेतील निवासस्थानी पोहोचली

News Desk

२६/११ हल्ल्यात पाकचा हात, लष्कराने बोलवली बैठक

News Desk