HW News Marathi
महाराष्ट्र

२०२४ नंतर जे घडेल ना…! – राऊतांचा भाजपला मोठा इशारा

मुंबई | “नवाब मलिक सतत सत्य बोलतात. त्यांच्यामागे ईडी आणि सीबीआय लावगेल जाते,” असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केला आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना आज (२३ फेब्रुवारी) दाऊद इब्राहिम मनी लॉड्रिंग प्रकरणी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी घेऊन गेले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी पहाटे ४.३० वाजता मलिकांच्या पोहोचले. ईडीच्या कार्यलयात मलिकांची सकाळी ७.४५ वाजता चौकशी सुरू आहे. मलिकांच्या अधिकाऱ्यांसोबत सीआरपीएफचे जवान होते. या पार्श्वभूमीवर मलिकांच्या घराबाहेर आणि ईडीच्या कार्यालयाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

राऊत म्हणाले, “नवाब मलिक किंवा आम्ही सतत सत्य बोलतात. त्यांच्यामागे ईडी आणि सीबीआय लावगेल जाते. मलिकांना आज सकाळी ईडीचे लोक त्यांच्या घरातून घेऊन गेले आहेत. त्यांची चौकशी होईल त्यांची आम्ही वाट पाहतोय. मलिक हे नक्की संध्याकाळी घरी येतील. माझे सर्वांशी बोलणे झाले. केंद्रीय तपास यंत्रणा राज्यातील कॅबिनेट मंत्र्याच्या घरी जावून त्यांना चौकशीसाठी घेऊन जाते. २०- २५ वर्षांपूर्वीचे जुन्या प्रकरण आहे. आणि ईडी त्यावर आता चौकशी करते. दरम्यान, किरीट सोमय्यांनी भाजपच्या नेत्यांची देखील काही प्रकरणे ईडीकडे दिली आहेत. ते भाजपचे नेते आज त्यांच्या पक्षात मंत्री आहे. त्यांची अनेक प्रकरणे आहेत त्यांचे  काही झाले का?, त्यांची चौकशी का केली जात नाही?,” असे म्हणत त्यांनी तपास यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केला आहे. 

“भ्रष्टाचाराविरोधात लढणारे महात्मा त्यांच्यासाठी हा शब्द चांगला आहे. कारण त्यांना मी काहीही बोललो तर त्यांना मी शिवी दिल्यासारखे वाटते, म्हणून ते जे महात्मा आहेत. त्यांच्याकडे ईडीचे अनेक प्रकरणे दिली आहेत. त्यांना ईडीकडून का समन्स दिले गेले नाही?, त्या सर्वांच्या घरी ईडीचे अधिकारी का पोहोचले नाही?, आता मी ही सर्व प्रकरणे पुन्हा एकदा ईडीकडे घेऊन जाणार, तक्रार कशी करायची हे आम्हाला माहिती आहे. आम्ही ज्या प्रकरणाच्या तक्रारी आधीच केलेल्या आहेत, त्यांचे पुढे काय झाले?, ईडीचे पथक हे फक्त महाविकासआघाडी, तृणमूल काँग्रेस, अखिलेश यादवांचा पक्ष, लालू यादवांचा पक्ष यांच्या पुरते मर्यादीत आहेत का?,” असे राऊत प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले. 

२०२४ नंतर जे काही घडेल ना, त्यासाठी तपास यंत्रणांनी तयार रहावे – राऊत

२०२४ नंतर हे सगळे चालेल, त्यानंतर आम्ही आणि ते आहोत, तपास यंत्रणा ही एखाद्या टोळी माफियाप्रमाणे मागे लावल्या जातात. पण आम्ही त्यांना घाबरत नाही. आमची लढाई सुरूच राहिल. त्यांना येऊ द्या आणि तपास करू द्या. शेवटी सत्याचा विजय होतो. २०२४ नंतर जे काही घडेल ना, त्यासाठी तपास यंत्रणांनी तयारी रहावे, असा धमकी वजा इशारा राऊतांनी भाजपला दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ब्राह्मण असल्याने मला टार्गेट केलं जातंय! देवेंद्र फडणवीसांचा रोख कोणावर?

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त दगडूशेठ गणपतीला तब्बल 61 किलोंचा मोदक…..!

News Desk

पिंपरीतील कोरोनाग्रस्त होत आहेत बरे, ५ जणांना आज मिळाला डिस्चार्ज

swarit