HW News Marathi
महाराष्ट्र

“केसेस कशा रद्द करायच्या हे अजितदादांकडून शिकावं”, नारायण राणेंची पवारांवर टीका!

सिंधुदुर्ग। मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेची सांगता केली. अजित पवारला अजून अज्ञान आहे. त्यांनी त्यांच्या खात्याचं पाहाव. मी अजून राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळलेलो नाही. एका रात्रीत आपल्यावरील केसेस आणि आरोप कशा काढायच्या हे अजित पवार यांच्याकडून शिकावं, असं नारायण राणे म्हणाले. माझ्याकडे सूक्ष्म, लघू आणि मध्यम खातं माझ्याकडं आहे. उद्योजक बनवणारा आणि रोजगार निर्माण करणारा विभाग आहे. दरडोई उत्पन्न वाढवणारा विभाग आहे. निर्यात वाढवणारा हा विभाग आहे. देशाचा जीडीपी वाढवणारा हा विभाग आहे. सिंधुदुर्गवासियांना सांगेन की उद्योजक व्हा, आमच्या विभागातर्फे तुम्हाला मदत केली जाईल. अर्जांची छाननी करुन मार्गदर्शन करावं, अशा सूचना अधिकाऱ्यांना देतो, असं नारायण राणे म्हणाले.

राणेंच्या मुलानं मला धमक्या दिल्या, त्याला मी अजिबात भीक घालत नाही

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेची सांगता केली. अजित पवारला अजून अज्ञान आहे. त्यांनी त्यांच्या खात्याचं पाहाव. मी अजून राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळलेलो नाही. एका रात्रीत आपल्यावरील केसेस आणि आरोप कशा काढायच्या हे अजित पवार यांच्याकडून शिकावं, असं नारायण राणे म्हणाले. माझ्याकडे सूक्ष्म, लघू आणि मध्यम खातं माझ्याकडं आहे. उद्योजक बनवणारा आणि रोजगार निर्माण करणारा विभाग आहे. दरडोई उत्पन्न वाढवणारा विभाग आहे. निर्यात वाढवणारा हा विभाग आहे. देशाचा जीडीपी वाढवणारा हा विभाग आहे. सिंधुदुर्गवासियांना सांगेन की उद्योजक व्हा, आमच्या विभागातर्फे तुम्हाला मदत केली जाईल. अर्जांची छाननी करुन मार्गदर्शन करावं, अशा सूचना अधिकाऱ्यांना देतो, असं नारायण राणे म्हणाले.

त्यानंतर या मोठ्या मंत्र्याचा बंगला पाडण्याचे आदेश निघाले

दीपक केसरकर म्हणाले, “एका मोठ्या मंत्र्याचा बंगला पाडल्याचे आदेश दिल्याचं काही लोक म्हणतात. मात्र, एका गरीब व्यक्तीला या जिल्ह्यातील एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मरेपर्यंत मारलं. यानंतर तो व्यक्ती पेटून उठला. त्याने या नेत्याची सर्व प्रकरणं उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेली. त्यानंतर या मोठ्या मंत्र्याचा बंगला पाडण्याचे आदेश निघाले. गरीब माणूस काय करु शकतो हे अनेक लोकांना माहिती नसतं. मात्र, गरीब माणूस असलो म्हणून अशाप्रकारे मारला जाता कामा नये. ही महाराष्ट्राची भूमी आहे, इथं हे चालणार नाही.”

राजकीय पक्ष हे का करु शकत नाही?

“मारहाण झालेल्या व्यक्तीला फ्लॅट देण्याचं आश्वासन देण्यात आलं. लाखो रुपयांची आश्वासनं देण्यात आली. मात्र, त्याने आपला संघर्ष सोडला नाही. या संघर्षासाठी न्यायालयाची दारं नेहमी उघडी असतात. हे करताना तत्वांपासून मागे जायचं नसतं. तत्व सोडली तर रिझल्ट मिळणार नाही. एक सर्वसामान्य व्यक्ती हे करु शकतो मग राजकीय पक्ष हे का करु शकत नाही?” असा सवाल केसरकर यांनी विचारला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही आजपर्यंत कधीही पवारसाहेबांना इतके चिडलेले पाहिले नव्हते !

News Desk

कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास व शहीद वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विनम्र अभिवादन

Aprna

चक्रीवादळामुळे रायगडमध्ये २ बळी, भिंत कोसळून झाला मृत्यू

News Desk