HW News Marathi
महाराष्ट्र

“शरद पवारांनी २५ वर्षापूर्वी जे सांगितलं, ते आम्हाला २ वर्षापूर्वी कळलं!”

मुंबई | भाजपला ऐक्य नको, हे शरद पवार यांनी २५ वर्षापूर्वी सांगितले. ते आम्हाला २ वर्षापूर्वीच कळाले, असे विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्यावर लिहिलेल्या ‘नेमकचि बोलणें’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा आज (११ डिसेंबर) पार पडला.

राऊत म्हणाले, “भाजपला ऐक्य नको, हे शरद पवार यांनी २५ वर्षापूर्वी सांगितले. हे आम्हाला २ वर्षापूर्वीच कळाले. भाजप देशाला मागे घेऊन जात आहे. भाजप देशाचे तुकडे करत असून भाजप देशाला उलट्या दिशेने असल्याचा पवारांनी १९९६सालीच सांगितले. परंतु सध्या देशात प्रश्न विचारण्याची परिस्थिती नाही, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे.” या पुस्तकाचे कव्हर भगव्या रंगाचे असल्यामुळे राऊत म्हणाले, “पुस्तकाच्या कव्हरला जे भगवे घातले आहे. याबद्दल आभारी आहे. हे सरकार एकाच रंगाचे झाले आहे. हे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवयाला हवे. कारण महाराष्ट्र हा देशाला रंग देत असतो.”

खुर्चीवर राऊतांची भाजपवर टीका

हिवाळी आदिवेशनात मी शरद पवार यांना खुर्ची दिल्यावर राऊतांवर भाजपने टीका केली. यावर राऊत म्हणाले, “शरद पवारांना मी खुर्ची का दिली हे समजण्यासाठी त्यांनी ते पुस्तक वाचले पाहिजे. जे व्यक्त अत्यंत विकृतने यावर टीका करत आहेत. त्या सर्वांनी हे पुस्तक वाचलेच पाहिजे. तेव्हा कळले की, माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराने शरद पवारांना खुर्ची का दिली?, त्यांचा तो मान आहे. सध्या देशात जे विकृत राजकारण सुरू आहे.”

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरुन अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल!

News Desk

दूरदर्शनमधील ‘आजच्या ठळक बातम्या’ सांगणारा भारदस्त आवाज प्रदीप भिडे काळाच्या पडद्याआड

Aprna

राज्याच्या महसुलात ऑगस्टमध्ये ३,७२४ कोटींनी झाली घट!

News Desk