HW News Marathi
महाराष्ट्र

“शरद पवारांनी २५ वर्षापूर्वी जे सांगितलं, ते आम्हाला २ वर्षापूर्वी कळलं!”

मुंबई | भाजपला ऐक्य नको, हे शरद पवार यांनी २५ वर्षापूर्वी सांगितले. ते आम्हाला २ वर्षापूर्वीच कळाले, असे विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्यावर लिहिलेल्या ‘नेमकचि बोलणें’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा आज (११ डिसेंबर) पार पडला.

राऊत म्हणाले, “भाजपला ऐक्य नको, हे शरद पवार यांनी २५ वर्षापूर्वी सांगितले. हे आम्हाला २ वर्षापूर्वीच कळाले. भाजप देशाला मागे घेऊन जात आहे. भाजप देशाचे तुकडे करत असून भाजप देशाला उलट्या दिशेने असल्याचा पवारांनी १९९६सालीच सांगितले. परंतु सध्या देशात प्रश्न विचारण्याची परिस्थिती नाही, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे.” या पुस्तकाचे कव्हर भगव्या रंगाचे असल्यामुळे राऊत म्हणाले, “पुस्तकाच्या कव्हरला जे भगवे घातले आहे. याबद्दल आभारी आहे. हे सरकार एकाच रंगाचे झाले आहे. हे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवयाला हवे. कारण महाराष्ट्र हा देशाला रंग देत असतो.”

खुर्चीवर राऊतांची भाजपवर टीका

हिवाळी आदिवेशनात मी शरद पवार यांना खुर्ची दिल्यावर राऊतांवर भाजपने टीका केली. यावर राऊत म्हणाले, “शरद पवारांना मी खुर्ची का दिली हे समजण्यासाठी त्यांनी ते पुस्तक वाचले पाहिजे. जे व्यक्त अत्यंत विकृतने यावर टीका करत आहेत. त्या सर्वांनी हे पुस्तक वाचलेच पाहिजे. तेव्हा कळले की, माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराने शरद पवारांना खुर्ची का दिली?, त्यांचा तो मान आहे. सध्या देशात जे विकृत राजकारण सुरू आहे.”

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीतील प्रस्थापितांना डावलून जयंत पाटलांच्या नातेवाईकांना मोठं पद

News Desk

अमृता फडणवीसांच्या कार्यक्रमासाठी पोलीस विकतायंत तिकिटे

News Desk

ईडीच्या कार्यालयासमोरआरोप करणाऱ्यांना जोड्याने मारलं नाही तर माझं नाव संजय राऊत नाही  

News Desk