HW News Marathi
महाराष्ट्र

बाजारात पैसे टाकले की संजय राऊत यांच्यासारखी माणसं भेटतात नितेश राणें यांची जहरी टीका!

मुंबई। आमदार नितेश राणे यांनी शिवसेना, संजय राऊत आणि महाविकास आघाडी वर जोरदार टीका केली. राजगुरूनगर इथं भाजप कार्यालयाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते.संजय राऊत सारखी माणसे बाजारात पैशाचा तुकडा टाकली की मिळतात.त्यांना महत्व देण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. ते नेमके शरद पवार यांचे आहेत की उद्धव ठाकरे यांचे त्यांना माहीत नाही असं सांगताना अतिशय शेलक्या शब्दात त्यांनी टीका केली.राज्यात सत्तेत असलेले बैल पाळवल्याशिवाय बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळणार नाही असं ही ते म्हणाले. नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत, त्यांना काही बैठका असतात त्यामुळे तिकडं उपस्थित राहवं लागतं, असंही नितेश राणे म्हणाले. शिवसेनेनं खेळ सुरु केला होता, आता आम्हाला आमच्या पद्धतीनं खेळ संपवावा लागेल, असंही नितेश राणे म्हणाले.

जामसंडे यात्रेत नारायण राणे काय म्हणाले?

दरम्यान, जामसंडे इथे नारायण राणेंनी भाषण केलं. यावेळी ते म्हणाले, “मोदी यांनी मला केंद्रीय मंत्री बनविले, भारताला मोदी प्रगतीकडे घेऊन जात आहेत. मोदींबदल गर्व आणि अभिमान वाटतो”

संजय राऊतांचा हल्लाबोल

नारायण राणे केंद्राचे मंत्री आहेत, त्यांची प्रकृती बरी नसते. अटकेचा प्रसंग आला तेव्हा ते आजारी पडले. मनस्वस्थ बिघडलं आहे. त्यांच्या मुलाने त्यांना त्रास देऊ नये, अशी टोलेबाजी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये केली. संजय राऊत यांनी नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे्य यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन राणेंना लक्ष्य केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आता राज ठाकरे मैदानात; राज्य सरकारशी चर्चा करणार

News Desk

अ‍ॅमेझॉनला धडा शिकवल्यानंतर आता मनसेने आपला मोर्चा डॉमिनोजकडे वळवला!

News Desk

जितेंद्र आव्हाडांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Manasi Devkar