HW News Marathi
मुंबई

संघाच्या आदेशाने चालणारे सरकार आरक्षणविरोधीः अशोक चव्हाण

 

भाजप-शिवसेनेने मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली

मुंबई, राज्यसरकारने मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशाने चालणारे राज्य सरकार आरक्षणविरोधी असल्यानेच मराठा समाजाला आरक्षण देत नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.

टिळकभवन येथे पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. चव्हाण म्हणाले की, काँग्रेस सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण या सरकारला टिकवता आले नाही. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाला आरक्षणाच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून न्यायालयात पूर्ण ताकद लावून लढणे आवश्यक आहे. परंतु ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचार व आदेशाने राज्यातील सरकार चालते, त्या संघाचा आरक्षणाला विरोध असल्याने राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत चालढकल करत आहे. मराठा आरक्षणाच्या होयकोर्टात सुरू असलेल्या खटल्यात एक प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी सरकारला दीड वर्षांचा कालावधी लागला यावरून हे सरकार आरक्षणाबाबत जाणीवपूर्वक चालढकल करित असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे चव्हाण म्हणाले.

सरकारने आरक्षणाची मागणी करणा-या मराठा आणि मुस्लीम समाजाची फसवणूक केली आहे. सत्तेत आल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. मात्र, राज्य सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली तरी आरक्षण मिळाले नाही. काँग्रेस सरकारने मुस्लीम समाजाला दिलेले आरक्षण सुरू ठेवण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे, पण भाजप सरकारने मुस्लीम समाजाला आरक्षण दिले नाही. सरकारच्या आरक्षणविरोधी भूमिकेमुळे मराठा आणि मुस्लीम समाजाच्या लाखो मुला मुलींचे शैक्षणिक नुकसान झाले असून अनेकांना सरकारी नोक-यांपासून वंचित रहावे लागले आहे. त्यांच्या झालेल्या नुकसानीला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे. सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंचे मूक मोर्चे काढले. मराठा समाजानंतर मुस्लीम समाजानेही मूक मोर्चे काढून आरक्षणाची मागणी केली. पण सरकारने त्यांच्या मागणीची दखल घेतली नाही. त्यामुळे मराठा आणि मुस्लीम समाजामाध्ये सरकार विरोधात तीव्र असंतोष आहे. मराठा समाजाने राज्यभरात केलेल्या चक्काजाम आंदोलनाची योग्य ती दखल घेऊन सरकारने मराठा आणि मुस्लीम समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे असे खा. चव्हाण म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेल्वेचे ट्रॅकमन करतायत अधिकाऱ्यांची सेवा!

News Desk

#CoronaVirus | वरळी कोळीवाड्यात कोरोनाचा पहिला बळी

News Desk

भाजपवर नाराज असलेले एकनाथ खडसे शरद पवारांच्या चरणी

News Desk