HW News Marathi
मुंबई

राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी अखेर पत्रकारांची दिलगीरी व्यक्त केली

माझ्या वक्तव्याने ज्यांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मने दुखावली त्या सर्वांची मी दिलगीरी व्यक्त करतो – दिलीप कांबळे

उत्तम बाबळे

नांदेड : – राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे हे हिंगोली जिल्ह्यातील एका शिवार संवाद यात्रेच्या कार्यक्रमानिमित्त मार्गदर्शन करत असतांना पत्रकारांवरती घसरले आणि पत्रकार,पोलीसांवर अर्वाच्च भाषेत बोलले. याच अनुशंगाने सबंध राज्यात पत्रकारांनी निषेध आंदोलने सुरु केल्याने २९ मे रोजी ना.दिलीप कांबळे यांनी अखेर एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलगीरी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य,मदत व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन,अल्पसंख्याक विकास व वक्फ आणि राज्य उत्पादन शुल्क राज्य मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे हे हिंगोली जिल्ह्याच्या दाै-यावर असतांना जिल्ह्यातील एका शिवार संवाद कार्यक्रमात बोलतांना पत्रकार व पोलीस यांच्यावर खालच्या तथा अर्वाच्च भाषेत बरगळले.एका संविधानिक पदावर असलेल्या जबाबदार व्यक्तीने लोकशाहीचा चाैथा स्तंभ असलेल्या पत्रकार व देशांतर्गत सुरक्षा सेवा बजावणा-या पोलीसांबद्दल असे बोलणे उचीत नसल्याने त्याचे पडसात सबंध राज्यात उमटले.त्यांच्या वक्तव्याचा जाहीर तीव्र निषेध करत पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करणारे विविध आंदोलने सर्वत्र होत आहेत.याची दखल ना.दिलीप कांबळे यांना घ्यावी लागली व नमते व्हावे लागले. २९ मे रोजी ना.दिलीप कांबळे यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढले व त्यात म्हटले आहे की, “पत्रकारीता ही लोकशाहीचा चाैथा स्तंभ आहे.पत्रकारीते विषयी मला प्रचंड आदर असून माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे.मी पत्रकारीतेतीलगैरप्रवृत्ती या विषयी बोललो होतो.परंतू संपुर्ण पत्रकारीतेला किंवा त्याक्षेत्राला उद्देशून वक्तव्य केले नव्हते.तरीही याबद्दल गैरसमज निर्माण करण्यात आला.तरी माझ्या वक्तव्या विषयी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ज्यांची मने दुखवली असतील त्यांच्या बद्दल मी दिलगीरी व्यक्त करीत आहे.” अखेर ना.कांबळे यांनी पत्रकारांची दिलगीरी व्यक्त केली असल्याने ना.कांबळे यांचा राजीनामा घेई पर्यंत पत्रकार विविध आंदोलन करणार का मोठे मन करुन क्षमा देणार ? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

परदेशातून आलेल्या मुलाला आढळला मातेचा सांगाडा

News Desk

रेल्वेने बांधलेल्या अर्धवट भिंतीमुळे चोरांना मार्ग मोकळा

News Desk

विरोधी पक्षांचे सभागृहात ठिय्या आंदोलन, राज्यपालांची घेणार भेट

News Desk
महाराष्ट्र

राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा मराठी पत्रकार संघाकडून निषेध

News Desk

 

उत्तम बाबळे

नांदेड – राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे हे जिल्ह्यातील एका संवाद यात्रेच्या कार्यक्रमानिमित्त मार्गदर्शन करताना पत्रकारावंर घसरले आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. कांबळे यांनी तात्काळ पदाचा राजीनामा देऊन पत्रकारांची माफी मागावी अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्याकडे नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने देण्यात आले.

हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी राबविण्यात येत असलेल्या संवाद यात्रे दरम्यान पत्रकारांविषयी अपशब्दासह अर्वाच्च भाषेचा वापरही केला. मी कोणाला घाबरत नाही, संपादक असो की, पत्रकार असो व पत्रकारांना पाकीटे दिली की, ते कोणाचेही छापतात आज आमचे आहेत उद्या कोणाचेही होतात, असे म्हणून थेट त्यांनी संपादकांवर हल्ला चढवत अर्वाच्च भाषेचाही वापर केला. यामुळे नांदेड मराठी पत्रकार संघाच्यावतीने त्यांचा निषेध व्यक्त करीत कांबळे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली.तसेच यासंबधी जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्याकडे निवेदन सादर केले. यावेळी मराठी पत्रकार संघाचे विभागीय सचिव विजय जोशी, जिल्हाध्यक्ष प्रकाश कांबळे, महानगराध्यक्ष पंढरीनाथ बोकारे, महानगर सचिव सुनील पारडे, सहसचिव प्रशांत गवळे, विश्वनाथ देशुमख, गोपाळ देशपांडे, चारूदत्त चौधरी, नागनाथराव देशमुख, बजरंग शुक्ला, प्रकाश नागला, संगमेश्वर बाचे, रविंद्र कुलकर्णी, प्रल्हाद लव्हेकर, महेंद्र देशमुख, अविनाश पाटील, नरेंद्र गडप्पा, माधव अटकोरे, सुभाष लोणे, कमलाकर बिराजदार, हरीहर धुतमल, प्रभाकर लखपत्रेवार, दिपंकर बावस्कर, आझम बेग, कुवरचंद मंडले, संजय सुर्यवंशी, गौतम गळेगावे, सदाशिव गच्चे, राहुल गजेंद्रगडकर, निळकंठ वरळे यांच्यासह आदींची यावेळी उपस्थिती होती.

Related posts

राज्याचे आरोग्य जपण्यासाठी शासन कटीबध्द! – डॉ.तानाजी सावंत

Aprna

लालबागच्या राजाने जनतेसाठी नेहमीच आदर्श ठेवला – मुख्यमंत्र्यांकडून मंडळाच्या ऐतिहासिक निर्णयाचे कौतुक

News Desk

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना निर्बंधातून सूट नाही; राजेश टोपे यांचं मोठं विधान!

News Desk