HW News Marathi
मुंबई

विद्यापीठाचे निकाल लागणे कठिण, कॉँग्रेसने केला अनोखा निषेध

मुंबई: विद्यापीठाचे यंदाचे निकाल हे नियोजित वेळेत लागणार नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे, याचा निषेध करण्यासाठी ठाण्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने तिरडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि कुलगुरू संजय देशमुख यांच्याविरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करावेत, असे स्पष्ट निर्देश कुलपती विद्यासागर राव यांनी कुलगुरुंना दिले असले, तरी या मुदतीत सर्व निकाल लागण्याची शक्यता नाही. वाणिज्य, कला आणि विधि विभागाचे निकाल आठवडाभर विलंबाने लागणार आहेत. विद्यापीठाच्या अंतर्गत येणाºया महाविद्यालयांच्या परीक्षा होऊन दोन महिने उलटले आहेत. मात्र, जाणून बुजून निकाल लावण्यात आलेले नाहीत, यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. ५०० हुन अधिक विषयांपेक्षा केवळ १०० परीक्षांचेच निकाल लागले आहेत. याकडे राज्य सरकार आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांनी लक्ष न दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसने केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Parel Fire | बिल्डर सुपारीवालाला पोलीस कोठडी

News Desk

चौथा चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी

News Desk

सरकार आहे की नकारघंटा?: विखे पाटील

swarit
महाराष्ट्र

पांडुरंग फुंडकर दांडी मारण्यात अव्वल

News Desk

मुंबई: राज्य मंत्रीमंडळ बैठकीत सतत दांड्या मारण्यात कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर अव्वल ठरले आहेत. त्यांच्यापोठपाठ वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, संभाजी निलंगेकर-पाटील, राजकुमार बडोले यांचा क्रमांक लागतो. माहिती अधिकारांतर्गत सचिवालयाने ही माहिती जारी केली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्य सचिव कार्यालयाकडे मंत्रिमंडळाच्या बैठकी आणि मंत्र्याची उपस्थितीची माहिती मागितली होती. मुख्य सचिव कार्यालयाचे अवर सचिव आणि जन माहिती अधिकारी केळकर यांनी ही माहिती दिली आहे. 17 जुलै 2016 पासून 22 मे 2017 या कालावधीत एकूण 35 मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपवाद वगळता 22 च्या 22 मंत्र्यानी दांडी मारली. या दांडी बहादुरीत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी अव्वल क्रमांक पटवित 35 पैकी 11 वेळा अनुपस्थित होते. त्यानंतर वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या दोघांनीही 9 वेळा अनुपस्थित राहत दुसरा क्रमांक पटकविला. यानंतर ग्रामीण आणि महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचा क्रमांक लागतो.

Related posts

चंद्रपूरमध्ये रेल्वे ब्रिज कोसळल्याने १० प्रवाशी जखमी

Aprna

शिवसेना मंत्री-नेत्यांची तातडीची बैठक, उद्धव ठाकरे राठोडांबाबत कठोर निर्णय घेणार ?

News Desk

आता हे तुम्ही करताय ते पुण्य? आम्ही पर्यावरणपूरक दिवे लावले ते पाप?

News Desk