HW News Marathi
मुंबई

विद्यापीठाचे निकाल लागणे कठिण, कॉँग्रेसने केला अनोखा निषेध

मुंबई: विद्यापीठाचे यंदाचे निकाल हे नियोजित वेळेत लागणार नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे, याचा निषेध करण्यासाठी ठाण्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने तिरडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि कुलगुरू संजय देशमुख यांच्याविरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करावेत, असे स्पष्ट निर्देश कुलपती विद्यासागर राव यांनी कुलगुरुंना दिले असले, तरी या मुदतीत सर्व निकाल लागण्याची शक्यता नाही. वाणिज्य, कला आणि विधि विभागाचे निकाल आठवडाभर विलंबाने लागणार आहेत. विद्यापीठाच्या अंतर्गत येणाºया महाविद्यालयांच्या परीक्षा होऊन दोन महिने उलटले आहेत. मात्र, जाणून बुजून निकाल लावण्यात आलेले नाहीत, यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. ५०० हुन अधिक विषयांपेक्षा केवळ १०० परीक्षांचेच निकाल लागले आहेत. याकडे राज्य सरकार आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांनी लक्ष न दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसने केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

चालक नसतानाही बस धावली

News Desk

पुढील दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार! – मुख्यमंत्री

Aprna

सुनंदा पुष्कर प्रकरणात सुब्रम्हण्यन स्वामींची याचिका फेटाळली

News Desk
देश / विदेश

मोदी, शहा नथुरामचे वारसरदार

News Desk

पाटणा( वृत्तसंस्था)-बिहारमधील सध्याच्या राजकीय भूकंपाचे सर्व खापर नितीकुमार यांच्यावर फोडत राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी मोदी व शहा यांनाही लक्ष्य केले आहे. ‘देशाला एकत्र आणण्यासाठी आज आपल्यात गांधीजी नाहीत, हे दुर्दैव आहे. मोदी आणि शहा नथुराम गोडसेच्या वारसदार असल्याचे लालू यांनी म्हटले आहे. बिहारमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडीनंतर लालू यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी, शहा यांच्यासह नितीशकुमार यांच्यावर टिकास्र सोडले. नितीशकुमार यांचाउल्लेख ‘भस्मासूर’ असा करत, ही मॅच फिक्स होती, आमचं काहीच चुकलेलं नाही, असा पवित्रा लालूंनी घेतला.

Related posts

सेनेचे संपर्क प्रमुख राहिलेल्या अरविंद सावंत यांच्यावर अवजड उद्योगाची जबाबदारी

News Desk

जवानाच्या दु:खाला सोशल मीडियाने फोडली वाचा

News Desk

सामंत गोयल यांची ‘रॉ’च्या प्रमुखपदी निवड

News Desk