HW News Marathi
मुंबई

विधानसभा निवडणुकीतील यश म्हणजे मोदी यांच्या नेतृत्वाला जनतेचा पाठिंबा

भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांची प्रतिक्रिया

उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मिळालेले ऐतिहासिक यश म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला जनतेने पुन्हा एकदा भरभक्कम पाठिंबा दिला असून विकासाच्या मुद्द्यावर शिक्कामोर्तब केले आहे. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या संघटनकौशल्यामुळे पक्षाचे हे ऐतिहासिक यश साकारले आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी शनिवारी व्यक्त केली. हा भाजपाचा विजय नव्हे तर महाविजय आहे, असे त्यांनी सांगितले.

खा. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, २०१४ ची लोकसभा निवडणूक भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या मुद्द्यावर जिंकली होती. त्यावेळी सुरू झालेली भाजपाच्या यशाची मालिका चालूच असल्याचे शनिवारच्या निकालाने स्पष्ट झाले आहे. गेली अडीच वर्षे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केलेल्या कामामुळे देशातील जनतेमध्ये भाजपाबद्दल विश्वास निर्माण झाला.अमित शाह यांच्या संघटनात्मक बांधणीमुळे जनतेच्या पाठिंब्याचे मतांमध्ये रुपांतर झाले.

त्यांनी सांगितले की, जातीपातीचे राजकारण करून विकासाचा मुद्दा मागे ठेवणाऱ्यांना जनतेने मतदानातून उत्तर दिले आहे. भाजपाच्या विकासाच्या मुद्द्याला पुन्हा एकदा जनादेश मिळाला आहे. जनतेच्या आशिर्वादाबद्दल भाजपा आभारी आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मिस्टर इंडिया स्पर्धेसाठी मुंबईचा  विदूर दीक्षित सज्ज

News Desk

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

आयएएस अधिकारी प्रवीण दराडेंमुळेच बाळासाहेब ठाकरे स्मारक’ रखडले

News Desk
महाराष्ट्र

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी वाघाला दत्तक घेतले

News Desk

ठाकरे कुटुंबाचा टायगर तर आमचा पँथर – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांचे नेतृत्व भारतीय दलित पँथर या आक्रमक संघटनेतून उदयास आल्याने पँथर संघटनेवर त्यांचे अतूट प्रेम राहिले आहे त्यामुळे आज वन्य जीव दिनानिमित्त पँथर अर्थात बिबट्या वाघाला दत्तक घेतले

एका पँथर ने पँथर ला दत्तक घेण्याचा सोहळा पहण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात प्राणी प्रेमी आणि पँथर प्रेमींनी मोठी गर्दी केली होती . ठाकरे कुटुंबाने सुद्धा यापूर्वीच टायगर दत्तक घेतला आहे त्याप्रमाणे आठवले कुटुंबाने पँथर दत्तक घेतला आहे

शिवसेनेचा टायगर आणि आरपीआय चा पँथर राजकीय जंगलात एकत्र आल्यावर संपूर्ण जंगलवर राज्यस्थापन करू शकतो याची प्रचिती शिवशक्ति भीमशक्ति च्या महायुतीतून मागे आम्ही दाखवून दिले आहे असे प्रतिपादन रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले .

ना रामदास आठवले यांचे सुपुत्र कु जीत आठवले यांच्या पुढाकारातून हा बिबट्या अर्थात पँथर दत्तक घेण्यात आला . या पँथर चे नाव ” भीम ” असे ठेवण्यात आले आहे . या पँथर च्या वर्ष भराचा देखभाल खर्च 1लाख 20हजाराचा धनादेश दहिसर तालुका रिपाइं तर्फे देण्यात आला आहे .

तथागत बुद्धांनी मनवाने मानवावर प्रेम केले पाहिजे तसेच प्राणिमात्रांवरही प्रेम केले पाहिजे असा उपदेश केला आहे त्यानुसार बिबट्या अर्थात पँथर दत्तक घेण्यात येणार आहे हा पँथर शहापुर येथे एका नदित जख्मी अवस्थेत सापडला होता त्याची देखभाल आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात होत आहे असे ना रामदास आठवले यावेळी म्हणाले .

पूर्वी शिवसेनेच्या टायगर चे आणि दलित पँथर चे जमत नव्हते मोठा संघर्ष होत होता आता मात्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ठाकरे कुटुंबाने घेतलेला टायगर आणि आम्ही घेतलेला पँथर एकत्र राहतील असेही ना आठवले म्हणाले . यावेळी सौ सीमाताई आठवले आणि कु जीत आठवले उपस्थित होते .

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंती निमित्त अन्य कार्यक्रम करणे टाळून दहिसर रिपाइं तालुका अध्यक्ष दिलीप वाव्हले यांनी वन्यजीव दिनानिमित्त हा उपक्रम राबविला .

Related posts

महाविकासआघाडी सरकार कसं आणि कधी पडणार हे अजित पवारांना माहिती आहे,चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट!

News Desk

भाजपच्या दुसऱ्या यादीत ‘या’ दिग्गज नेत्यांची नावे नाही

News Desk

नानाच्या नाना तऱ्हा!! ‘सकाळी आयसोलेशन अन् रात्री सेलिब्रेशन!, भाजपचा टोला

News Desk