HW News Marathi
मुंबई

शून्य कचरा प्रदर्शनातून नागरिकांनी घेतले खत निर्मितीचे प्रशिक्षण

मुंबईत दररोज लाखो टन निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न मुंबई महापालिकेपुढे गहन झाला आहे. मुंबईतील डम्पिंग ग्राऊंडही मोठया प्रमाणात निर्माण होणारा कचरा टाकण्यास अपुरे पडत आहेत. त्यावर तोडगा म्हणून मुंबई महापालिकेने येत्या 2 ऑक्टोबर पासून मोठया सोसायटीतील कचरा उचलणार नसल्याचे जाहीर केले आहे. सोसाटयांनीच आपल्या कचऱ्याची विल्हेवाट लावायची आहे. म्हणून या कचऱ्याच नेमक करायच काय यासाठी के पूर्व पालिका विभागाने शून्य कचरा प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या तीन दिवसीय प्रदर्शनाला सुमारे 10 हजार नागरिकांनी भेट देत कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया समजून घेत कचऱ्यापासून खत निर्मितीचे प्रशिक्षणही घेतले.

कचऱ्यापासून कमी वेळेत खतनिर्मिती करता येते तेही कमी खर्चात याच प्रात्यक्षिके अंधेरीच्या के पूर्व पालिका विभागात आयोजित केलेल्या शून्य प्रदर्शनातून उलघडून दाखवण्यात आले.

घरांत निर्माण होणारा ओला, सुका कचरा व इतर कचरा वेगळा करून कचरा शून्य कचरा प्रकल्प कसा राबविला जातो, याचे उदाहरण शून्य कचरा मोहिम राबवत असलेल्या अंधेरी पश्चिमेकडील विजयनगर सोसायटी व पूर्वेकडील ब्लॉसम सोसायटी, देवांगिनी सोसायटी, स्वच्छ पार्ले अभियान यांनी प्रदर्शनाला भेट देणार्या नागरिकांना समजावून सांगितले. प्रदर्शनात खत निर्माण करणारी अनेक यंत्रसामुग्री ठेवण्यात आली होती. या यंत्रसामुग्रीचा वापर गृहनिर्माण संस्था, औद्योगिक वसाहती, मोठी हॉटेल्स, रुग्णालय आधी ठिकाणी कसा केला जाऊ शकतो याची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.

कचऱ्याचे नियोजन करणे आवश्यक आहे, कचऱ्यापासून खतनिर्मितीची प्रक्रिया अधिकाधिक नागरिकांना समजावी म्हणून हे प्रदर्शन भरवण्यात आल्याचे के पूर्व पालिका विभागाचे सहायक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांनी म्हटले.

गेल्या 6 महिन्यांपासून आम्ही शून्य कचरा प्रकल्प राबवत आहोत, ओल्या कचऱ्यापासून आम्ही खत तयार करतो आणि त्याचा वापर सोसायटीतीलच झाडांसाठी वापरतो, सुका कचऱ्याची विक्री करतो. त्यामुळे पालिकेकडे आमचा कचरा जमाच होत नाही. आमच्या संस्थेतील सर्व रहिवाशांनी याला पाठिंबा दिल्यामुळे आम्ही शून्य कचरा प्रकल्प यशस्वीपणे राबवू शकल्याचे ब्लॉसम सोसायटीचे सदस्य अनिल तांबे यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘चितळे बंधुं’चे कामगार संपावर!

News Desk

… म्हणून महाराष्ट्रातील 11 विद्यापीठाचा कारभार झाला ठप्प

News Desk

उद्धव ठाकरे यांचे गलिच्छ राजकारण :नितेश राणे

swarit