HW News Marathi
मुंबई

२०० रूपयांची नोट लवकरच

नवी दिल्ली: येत्या १५ आॅगस्टपूर्वी २०० रुपयांची नवी नोट चलनात येण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात झालेल्या एका बैठकीत आरबीआयने दोनशे रूपयांची नोट बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या चलनात असलेल्या नोटांएवढाच आकार दोनशे रुपयाच्या नोटांचा असेल. चलनात आल्यानंतर दोनशेच्या नोटांची कमी भासू नये, यादृष्टीने मोठ्या प्रमाणात छपाई सुरू करण्यात आली असल्याचे समजतेय.

दोनशे रूपयांची नोट कधी चलनात आणायची याबाबतही सरकारचा निर्णय झाला असल्याची सूत्रांची माहिती आहे. १५आॅगस्टपूर्वी दोनशे रूपयांची नोट चलनात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोनशे रूपयांच्या नव्या नोटेची छपाई करताना सुरक्षेच्या दृष्टीने विशेष पावले उचलण्यात आली आहेत. दोनशे रूपयांच्या नकली नोटा बाजारात येऊ नये, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही समजतय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

लता मंगेशकर यांच्या नावाने लाखोंचा गंडा

News Desk

माहुल प्रकल्पग्रस्तांचे ‘जीवन बचाव आंदोलन’

swarit

मुंबईतील कोस्टल रोडच्या खोदलेल्या खड्यात पडून मुलाचा मृत्यू

News Desk
देश / विदेश

मोदी, शहा नथुरामचे वारसरदार

News Desk

पाटणा( वृत्तसंस्था)-बिहारमधील सध्याच्या राजकीय भूकंपाचे सर्व खापर नितीकुमार यांच्यावर फोडत राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी मोदी व शहा यांनाही लक्ष्य केले आहे. ‘देशाला एकत्र आणण्यासाठी आज आपल्यात गांधीजी नाहीत, हे दुर्दैव आहे. मोदी आणि शहा नथुराम गोडसेच्या वारसदार असल्याचे लालू यांनी म्हटले आहे. बिहारमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडीनंतर लालू यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी, शहा यांच्यासह नितीशकुमार यांच्यावर टिकास्र सोडले. नितीशकुमार यांचाउल्लेख ‘भस्मासूर’ असा करत, ही मॅच फिक्स होती, आमचं काहीच चुकलेलं नाही, असा पवित्रा लालूंनी घेतला.

Related posts

कार्ती चिदम्बरम यांच्या घरावर ईडीचे छापे

News Desk

सीबीआय संचालकांना रातोरात का हटवले? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

News Desk

शेतकऱ्यांनी २६ जानेवारीला ट्रॅक्टर रॅली न काढण्याची केंद्राची विनंती 

News Desk