HW News Marathi
मुंबई

कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू, २ अभियंत्यांना अटक

मुंबई | अंधेरीतील ईएसआयसी (ESIC ) मरोळ परिसरातील कामगार रुग्णालयाला बुधवार (१९ डिसेंबर) पुन्हा आग लागली आहे. कामगार रुग्णालयाला सोमवारी(१७ डिसेंबर) आणि बुधवार (१९ डिसेंबर) दोन वेळा लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी (१७ डिसेंबर)ला लागलेल्या भीषण आगीत १४६ जण जखमी झाले तर याच आगीत जखमी झालेले किसन नरावडे यांचा आज गुरुवारी (२० डिसेंबर) उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कामगार रुग्णालय आग प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी सुप्रमी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना गुरुवारी (२० डिसेंबर) अटक करण्यात आली आहे. या दोघांच्या निष्काळजीपणाचा ठपका ठेवत कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सुप्रीम कन्स्ट्रक्शन कंपनीचा अभियंता नीलेश मेहता आणि सहायक अभियंता नितीन कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्याआधीच रुग्णांना इमारतीमध्ये प्रवेश का दिला होता?, याबाबत त्या दोघांकडे चौकशी सुरू आहे. दोघांना याप्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती परिमंडळ १०चे पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली. दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मेट्रोचा खांब बेस्टवर कोसळला

swarit

वरळीच्या लाल चाळीतील रहिवाशांचा संघर्ष

News Desk

जाणून घ्या…बेस्ट प्रशासनाच्या अहवालातील महत्त्वाचे मुद्दे

News Desk