HW News Marathi
मुंबई

कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू, २ अभियंत्यांना अटक

मुंबई | अंधेरीतील ईएसआयसी (ESIC ) मरोळ परिसरातील कामगार रुग्णालयाला बुधवार (१९ डिसेंबर) पुन्हा आग लागली आहे. कामगार रुग्णालयाला सोमवारी(१७ डिसेंबर) आणि बुधवार (१९ डिसेंबर) दोन वेळा लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी (१७ डिसेंबर)ला लागलेल्या भीषण आगीत १४६ जण जखमी झाले तर याच आगीत जखमी झालेले किसन नरावडे यांचा आज गुरुवारी (२० डिसेंबर) उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कामगार रुग्णालय आग प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी सुप्रमी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना गुरुवारी (२० डिसेंबर) अटक करण्यात आली आहे. या दोघांच्या निष्काळजीपणाचा ठपका ठेवत कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सुप्रीम कन्स्ट्रक्शन कंपनीचा अभियंता नीलेश मेहता आणि सहायक अभियंता नितीन कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्याआधीच रुग्णांना इमारतीमध्ये प्रवेश का दिला होता?, याबाबत त्या दोघांकडे चौकशी सुरू आहे. दोघांना याप्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती परिमंडळ १०चे पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली. दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

swarit

मरे’चे रडगाणे सुरूच

News Desk

द्रविता सिंग राहिली स्वत:च्या पायावर उभी

News Desk
राजकारण

आमच्या ‘या’ काही उत्साही नेत्यांना दुसरे काम देण्याची गरज !

News Desk

नवी दिल्ली | “आमच्याकडे असे बरेच नेते आहेत ज्यांना माध्यमांशी बोलायला प्रचंड आवडते. त्यामुळे आम्हाला आता आमच्या या काही उत्साही नेत्यांना दुसरे काहीतरी काम देण्याची गरज आहे”, असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा भाजप नेत्यांना घरचा आहेर दिला आहे. राफेल विमान खरेदी करार प्रकरणी संपूर्ण देशापुढे आपली बाजू मांडण्यासाठी भाजपकडून देशभरात तब्बल ७० पत्रकार परिषदा घेण्यात येणार आहेत. याबाबत नितीन गडकरी बोलत होते.

नितीन गडकरी यांनी यावेळी एका प्रसिद्ध हिंदी चित्रपटातील दृश्याचा दाखला देत आपले म्हणणे मांडले आहे. ‘बाँबे टू गोवा’ या हिंदी चित्रपटातील एका दृश्यात आपल्या मुलांना खाण्यापासून अडविण्यासाठी आई-वडील त्यांच्या तोंडात कापडाचा गोळा कोंबतात. आमच्या पक्षातील काही लोकांना देखील अशाच कापडाच्या गोळ्याची आवश्यकता असल्याचे नितीन गडकरी यांनी यावेळी म्हटले.

नितीन गडकरी यांनी अनेकदा आपल्या पक्षातील नेत्यांच्या तसेच कार्यकर्त्यांचा खटकणाऱ्या गोष्टींवर भाष्य केले आहे. काही महिन्यांपूर्वी नितीन गडकरींनी पक्षातील कार्यकर्त्यांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली होती. “भाजप कार्यकर्त्यांचे वर्तन हे खरोखरीच अटलजींना अपेक्षित वर्तन आणि विचारांसारखे आहे का ?”, असा सवाल नितीन गडकरी यांनी केला होता. त्याचप्रमाणे, भाजपचे कार्यकर्ते, नेते हे ‘माझ्या गळ्यात लहान हार का घातला ह्यापासून मला फक्त चहाच का दिला, बिस्कीट का नाही ?’ अशा कोणत्याही क्षुल्लक कारणांवरून वाद घालत असतात असेही नितीन गडकरी यांनी म्हटले होते.

Related posts

सांगलीमधील जत तालुक्यातील 40 गावांचा कर्नाटकात समावेश?, बोम्मईंचे मोठे वक्तव्य

Aprna

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ‘फ्रीडम पार्क ते खापरी’ दरम्यान मेट्रोने प्रवास

Chetan Kirdat

पदवीचे वाद तो सर्व बाबतीत बाद !

swarit