HW News Marathi
मुंबई

मुंबईत 108 मिलीमीटर पावसाची नोंद

मुंबई | मुंबईसह उपनगरात रविवारी रात्री पासून पावसाची धार सुरु आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे सध्या मुंबईत 108 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. येत्या 24 तासात मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. मुंबईकरांना येत्या 24 तासात सतर्क रहाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पावसामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांचे हाल होताना पहायला मिळत आहेत. रविवार पासून पडत असल्यामुळे पावसाचा परीणाम रेल्वे वाहतूकीवर झाल्याचे दिसून येत आहे. रेल्वे वाहतूक 10-15 मिनिटाने उशीरा होताना पहायला मिळत आहे.

मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वेच्या वाहतूकीवर याचा परीणाम झाल्याने सकाळी लवकर निघालेल्या चाकारमान्यांना कार्यालयात पोहचायला विलंब होत आहे. रविवारपासून मुंबईसह , उपनगर, ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई, याठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईत गेल्या 21 तासात 108 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विषबाधा

News Desk

शक्ती मिल बलात्कारप्रकरणी आरोपींना फाशी शिक्षा कायम | मुंबई उच्च न्यायालय

News Desk

भारतीय लष्करावर पादचारी पुल बांधण्याची वेळ !

News Desk
मुंबई

बाळासाहेब यांच्या जन्मदिनी शिवसेनेचा वाघ आक्रमक…

News Desk

बाळासाहेबांच्या जन्मदिनी शिवसेनेने मोठी घोषणा केली.2019 ची निवडणूक भाजपसोबत लढणार नसल्याची घोषणा कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना सत्तेला लाथ मारण्याची घोषणा करत असली तरी सत्तेतून बाहेर पडण्याचे धाडस ते दाखवू शकले नाही.

2014 ची विधानसभा निवडणूक शिवसेनेने स्वबळावरच लढली होती. त्यात त्यांना बऱ्यापैकी यश मिळाले. परंतु सत्तेसाठी त्यांनी पुन्हा भाजपसोबत घरोबा केला. एकूणच शिवसेनेची ही घोषणा राजकीय स्टंट वाटतो. यातून पुन्हा एकदा सत्तेत येण्याची स्वप्न शिवसेना पाहत असल्याचे राजकीय जाणकारांना वाटते.

शिवसेना अनेक बाबींत दुटप्पी भूमिका घेत आलेली आहे. दरम्यान, शिवसेनेच्या एकाला चलोच्या भूमिकेबाबत भाजपने अत्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच विरोधकांना काही मत मांडलेले नाही. स्वबळाच्या भाषेमुळे आगामी निवडणूक राज्यातील समिकरणे कसे असतली याचे आखाडे सध्या बांधले जात आहेत.

Related posts

नागालँडमध्ये भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांनी पाडला पैशाचा पाऊस

News Desk

कासकरच्या हस्तकांनी खंडणीतील सोने उधळले बारबालांवर

News Desk

पुणे रेल्वे टीसीने केली प्रवाश्याला मारहान

News Desk