HW News Marathi
मुंबई

मराठा-दलित समाजात फूट पाडण्याचा डाव

मुंबई | कोपर्डी प्रकरणानंतर मराठा- दलित समाजात रोष वाढला होता. काही समाजाने त्याला खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला. त्यातून एट्रोसिटीचा मुद्दा लावून धरण्यात आला होता. हा काहींचे षडयंत्र असल्याचे आठवले म्हणाले. परंतु सध्या दलित समाज जागृक झाला आहे. दलित आणि मराठा यांच्यात जो संघर्ष सुरू होता, तो थांबला आहे. दोन्ही समाजाने अशीच एकजूट दाखवण्याची गरज असल्याचे आठवले यांनी सांगितले.

  • ऍट्रोसिट ऍक्ट

सुप्रिम कोर्टाच्या मतांशी आम्ही सहमत नाही. ९० टक्के केसेस खोट्या असतात त्याला आम्ही सहमत नाही. ज्या ठिकाणी दलितांवर हल्ला होतो. महिलेवर अत्याचार होतात. एका अधिकाऱ्याच्या बाबतीत खोटी केस झाली असले परंत सर्व केसेस खोट्या नसतात. आम्ही या प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करणार आहोत, असे आठवले यांनी सांगितले.

  • खेडचा प्रकार निंदनिय

रत्नगिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. हा प्रकार चुकीचा असून पुतळ्याची विटंबना करून कुणाचे विचार मारता येत नाहीत. या प्रकरणात जो कोणी दोषी असले त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आठवले यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोरेगाव स्थानकात तांत्रिक बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

सीएसटीजवळ लोकल घसरली

News Desk

सीएनजी, पीएनजीचे भाव वधारले

News Desk