HW News Marathi
मुंबई

प्रवाशांचे हाल, एसी लोकलमध्ये एसी बंद

मुंबई | बोरीवलीहून चर्चगेटला जाणाऱ्यांना एसी लोकलच्या १२ डब्यांपैकी तीन ३ डब्यातील एसी बंद होते. त्यामुळे प्रवाशांनी एसी लोकलची चैन खेचून अंधेरी रेल्वे स्थानकात ट्रेन थांबवली. एसी लोकलच्या तीन डब्यात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे एसी बंद झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी दिली आहे. त्यावेळी प्रवाशांनी रेल्वे स्थानकात गोंधळ निर्माण झाला होता. प्रवाशांचा गोंधळ शांत करण्यासाठी रेल्वे पोलिसांनी अंधेरी स्थानकात दाखल झाली.

प्रवाशांनी अंधेरी रेल्वे स्थानकात एसी लोकल २० मिनिटे थांबली होती. त्यामुळे स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती. एसी लोकलच्या फक्त तीन डब्यात एसी बंद होता. इतर ९ डब्यात एसीमध्ये कोणतीही समस्या नव्हती. एसी लोकलमुळे झालेला गोंधळ रेल्वे पोलिसांनी शांत करुन रेल्वे चर्चगेटच्या दिशेने रवाना झाली. चर्चगेटनंतर एसी लोकलला यार्डमध्ये पाठवण्यात आली आहे. त्यामुळे आज दिवसभरात एसी लोकल धावणार नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का, अवधूत तटकरे शिवबंधनात

News Desk

28 हजार महापालिका कर्मचारी करत आहेत मुंबईची स्वच्छता

News Desk

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीने राजकारण तापले; 3 महिन्यांपासून स्थानिकांची पाण्यासाठी वणवण

Chetan Kirdat
देश / विदेश

भारतीय लष्कराकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

श्रीनगर | काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन ऑल आऊट मोहीम अधिक तीव्र झाल्याचे पहायला मिळत आहे. लष्कराने शुक्रवारी सकाळी आणखी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्या वृत्त समोर आले आहे. अनंतनाग जिल्ह्यातील स्रीगुफवारा भागात सकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना ठार केले असून, या चकमकीत एक पोलीस कर्मचारी देखील शहीद झाला असून दोन नागरिक जखमी झाल्याती माहिती समोर आली आहे.

जम्मू काश्मीरचे डीजीपी एस. पी. वैद्य यांनी यांनी या संदर्भात बोलताना सांगितले आहे की, या परिसरात तीन ते चार दहशतवादी लपून बसल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानंतर पहाटेपासून या चकमकीला सुरुवात झाली त्यामध्ये आतापर्यंत तीन दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. तर एका पोलीस कर्मचाऱ्याला वीरमरण आले आहे. तसेच दोन नागरिक जखमी झाले आहेत.”

Related posts

वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांच्यावर चाकू हल्ला

Gauri Tilekar

ज्यांचे फोटो छापायचे ते छापा, आपापसात मारामाऱ्या करा…महाजॉब पोर्टलच्या जाहिरातीवर फडणवीसांची प्रतिक्रिया

News Desk

इंधन दरवाढ, पेट्रोल १७ पैसे तर डिझेल १९ पैशांनी महागले

News Desk