HW News Marathi
मुंबई

….म्हणून शिवसेना सत्तेला चिटकून

मुंबई: महापालिकेच्या पोटनिवडणुकीत भांडूपची जागा भाजपने काबिज केल्याने शिवेसनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. भाजप बरोबरीत आल्याने कधीही सत्तेसाठी दावा करू शकतो किंवा विधानसभा निवडणुकीपूर्वी धक्का देऊ शकतो, याची भीती शिवसेनेला सतावू लागली आहे. पुढील वर्षभरात महापालिकेवर भाजप दावा करण्याची शक्यता आहे.मुंबई महापालिकेत शिवसेनेचे ८४ नगरसेवक आहेत.

त्यांच्याकडे बहुमत नव्हते, तरी भाजपने पाठिंबा दिल्याने ते सत्तेवर आहेत. भांडुपच्या निकालानंतर भाजपचे संख्याबळ ८३ नगरसेवक झाले आहे. म्हणजे दोन्ही पक्ष जवळपास आले आहेत. नगरसेवकांची संख्या समसमान झाल्यास भाजप आणखी अपक्षांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करू शकते. त्यामुळे शिवसेनेची सत्ता अडचणीत येऊ शकते. याच भितीपोटी शिवसेना पक्षप्रमुख सरकारचा पाठिंबा काढून घेत नसल्याचेही बोलले जात आहे. असे झाल्यास राज्यातील सत्ता हातून जाण्याची भीती आहे, उरलेली मुंबई महापालिकाही ताब्यातून गेली तर तेल गेले तूप गेले, अशी आवस्था शिवसेनेची होईल, असे जाणकारांनी वाटते. पोटनिवडणुकीतून तरी असेच संकेत मिळत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नेवाळीतलं शेतकऱ्यांचं आंदोलन पेटलं

News Desk

श्रीदेवी यांच्याविषयीच्या काही ‘खास’ गोष्टी!

Adil

इंद्राणी मुखर्जीला रुग्णालयातून डिस्चार्ज

News Desk