HW News Marathi
मुंबई

Independence Day | स्वातंत्र दिनानिमित्त मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंना तिरंग्याची रोषणाई

मुंबई | स्वातंत्र दिनाच्या पूर्व संध्येपासूनच राजधानी दिल्ली प्रमाणेच मुंबईत देखील भारतीयांचा उत्साह पहायला मिळत आहे. शहरात मुंबई महापालिकेचे मुख्यालय तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या ऐतिहासिक वास्तू तिरंग्याच्या रंगात नाहून निघाल्याचे पहायला मिळत आहे. मुंबईकरांमध्ये देखील स्वातंत्र दिनाचा उत्साह मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे.

महापालिका मुख्यालयासमोर असलेल्या सेल्फी पॉईंटवर सेल्फी काढण्यासाठी तसेच तिरंग्याचे रंग सेल्फीत कैद करण्यासाठी मुंबईकर प्रचंड संख्येने उपस्थित असल्याचे पहायला मिळाले. अनेक तरुण मंडळी याठिकाणी फोटोग्राफी चा आनंद घेताना पहायला मिळाली.

मुंबईच्या वैभवात भर घालणाऱ्या या दोन्ही वास्तू स्वातंत्र्य दिनानिमित्त हजारो दिव्यांनी उजळून गेलेल्या पहायला मिळाल्या. तिरंगी रोषणाई पाहण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीसमोर अनेकांजण गर्दी देखील केली. या नयनरम्य दृष्याला दरवर्षी काहीजण डोळ्यातं तर काही जण आपल्या कॅमेऱ्यात कैद करतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गुन्हे शाखेचे अति. आयुक्त प्रसन्न यांचे अधिकार काढून घेतले

News Desk

विद्यापीठाचे निकाल लागणे कठिण, कॉँग्रेसने केला अनोखा निषेध

News Desk

गोखले पूल दुर्घटनेला रेल्वे-पालिका नक्की जबाबदार कोण ?

News Desk
मुंबई

उत्तर भारतीयांच्या मागे उद्धव ठाकरे खंबीरपणे उभे

News Desk

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उत्तर भारतीयांच्या मागे खंबीरपणे पणे उभे आहेत असे वक्तव्य शिवसेना नेते आणि ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. कांदिवली (पूर्व) ठाकूर व्हिलेज येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘उत्तर भारतीय सम्मान’ संमेलनात ते बोलत होते. आमदार प्रकाश सुर्वे यांनी या संमेलनाचे आयोजन केले होते. या संमेलनाला राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, उत्तर भारतीय महासंघाचे अध्यक्ष हेमंत पांडे, प्रभाग समिती अध्यक्ष शितल म्हात्रे आदि मान्यवर उपस्थित राहिले होते. येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उत्तर भारतीय मतदारांना साद घालताना पहायला मिळत आहे.

कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबईत जेंव्हा उत्तर भारतीयांना मारपीठ झाली त्यावेळी, आमदार प्रकाश सुर्वे यांनी उत्तर भारतीयांच्या समर्थनार्थ रॅली काढली होती. शिवसेना पक्ष सदैव उत्तर भारतीयांच्या पाठीशी उभा आहे. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उत्तर भारतीयांच्या मागे खंबीरपणे पणे उभे असून अनेक उत्तर भारतीयांना शिवसेनेत महत्वाची पद देण्यात आल्याची आठवण सुद्धा शिंदे यांनी उपस्थित जनसमुदायाला यावेळी करून दिली.उत्तर भारतीय सम्मान’ संमेलनाला विशेष भोजपुरी रंगा रंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी भोजपुरी सुपरस्टार खेसारीलाल यादव आणि प्रसिद्ध अभिनेत्री रितू सिंह यांची विशेष उपस्थिती होती.

Related posts

बनावट किन्नर विरोधात कारवाई करा- किन्नर माय ट्रस्टची मागणी

News Desk

सिंधिया हाऊस इमारतीला आग

swarit

हा विजय वेगळाच – उद्धव ठाकरे

News Desk