HW News Marathi
मुंबई

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई

मुंबई | सालाबादाप्रमाणे यंदाही मुंबईत पावसाला सुरुवात होताच मुंबईची तुंबई झालेले अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे. परंतु दरवर्षी मुंबईकर महापालिकेच्या नावाने ओरडतात, मात्र यंदा मुंबई महापालिकेने मुंबई तुंबल्यास त्याला सरकार जबाबदार असेल असे म्हणत सर्व खापर राज्यसरकारच्या डोक्यावर फोडले आहे.

शनिवारी पहाटेपासून मुंबईत पावसाने जोर धरल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सायन, माहिम, माटुंगा त्याचबरोबर हिंदमता परीसरात पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. त्यातच मॅंनहोलची झाकणं चोरीला गेल्यामुळे अनेक ठिकाणी मॅनहोल उघडे आहेत. त्यामुळे पावसाच्या सलामीनेच मुंबईकर पुरते हैराण झाले आहेत. पालिकेने सादर केलेल्या माहिती नुसार मुंबईत 200 हून अधिक ठिकाणी यंदाच्या पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा मेट्रोसाठी खोदकाम झाल्यामुळे रस्ते देखील अरुंद झाले आहेत. रस्ते अरुंद जागोजागी पाणी तुंबल्यामुळे मुंबईकरांना या पावसाळ्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. मान्सून पुर्व पावसात मुंबई भरायला सुरुवात झाली होती त्यामुळे पिक्चर अभी बाकी है असेच तुर्तास म्हणावे लागणार आहे.

यंदाच्या पहिल्यापावसात रुळावर पाणी साचल्यामुळे शनिवारी सकाळी रेल्वे वाहतूक धिम्या गतीने सुरु होती. या पावसाळ्यात मेट्रो प्रकल्प, गटारांची वेळेत साफसफाई न होणे, अरुंद झालेले रस्ते त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी यांसारख्या असंख्य समस्यांना मुंबईकर सामोरे जाणार आहेत एवढं नक्की.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सर्व्हर डाऊन

Aprna

गोरेगावत दोन गोदामांना भीषण आग ,15 जणांना बाहेर काढले

swarit

ठाण्यातील चराई येथील शिव आनंद उद्योग संकुलात आग

News Desk
मुंबई

भर पावसात डबेवाल्यांची सेवा सुरु

News Desk

मुंबई | पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अगदी पावसाच्या सलामीलाच मुंबईत जागो जागी पाणी भरले आहे. शुक्रवारी पहाटेपासून मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत वर्षाचे 12 महिने मुंबईकरांना वेळेत डबा पोहचविणारे डबेवाले मात्र भर पावसात काम करताना पहायला मिळत आहे.

उन,वारा,पाऊस जरी असला तरी मुंबईचा डबेवाला मात्र आपली डबे पोहचविण्याची सेवा देण्यासाठी जीवाचा आटापिठा करत असतो. शनिवारी सकाळी भर पावसात भायखळा-राणीबाग या विभागात जेवणाचे डबे देण्याचे काम रोहीदास सावंत हे डबेवाले हसत हसत करत असल्याचे दिसून आले.

शनिवारी 1 नंतर मुंबईत पावसाने अधिकच जोर धरल्याचे दिसून आले. तरीही दुपार नंतरच्या जेवणानंतर रिकामे झालेले डबे तुंबलेल्या पाण्यातून मुंबईचे डबेवाले जमा करत असल्याचे दृश्य शनिवारी पहायला मिळाले. मुंबईतला कर्मचारी जर उन्हाळ पावसाळा काम करु शकतो तर मुंबईचा डबेवालाही त्यांना तितक्याच तत्परतेने जेवन वेळेत पोहचविण्याची मेहनत घेतो असे मत मुंबई डबेवाला असोसिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी व्यक्त केले.

Related posts

माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा घसरली

News Desk

अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचारप्रकरणी शिपाई अटकेत

News Desk

कंगना विरोधात दाखल करण्याचे आदेश, धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप

News Desk