HW News Marathi
मुंबई

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई

मुंबई | सालाबादाप्रमाणे यंदाही मुंबईत पावसाला सुरुवात होताच मुंबईची तुंबई झालेले अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे. परंतु दरवर्षी मुंबईकर महापालिकेच्या नावाने ओरडतात, मात्र यंदा मुंबई महापालिकेने मुंबई तुंबल्यास त्याला सरकार जबाबदार असेल असे म्हणत सर्व खापर राज्यसरकारच्या डोक्यावर फोडले आहे.

शनिवारी पहाटेपासून मुंबईत पावसाने जोर धरल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सायन, माहिम, माटुंगा त्याचबरोबर हिंदमता परीसरात पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. त्यातच मॅंनहोलची झाकणं चोरीला गेल्यामुळे अनेक ठिकाणी मॅनहोल उघडे आहेत. त्यामुळे पावसाच्या सलामीनेच मुंबईकर पुरते हैराण झाले आहेत. पालिकेने सादर केलेल्या माहिती नुसार मुंबईत 200 हून अधिक ठिकाणी यंदाच्या पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा मेट्रोसाठी खोदकाम झाल्यामुळे रस्ते देखील अरुंद झाले आहेत. रस्ते अरुंद जागोजागी पाणी तुंबल्यामुळे मुंबईकरांना या पावसाळ्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. मान्सून पुर्व पावसात मुंबई भरायला सुरुवात झाली होती त्यामुळे पिक्चर अभी बाकी है असेच तुर्तास म्हणावे लागणार आहे.

यंदाच्या पहिल्यापावसात रुळावर पाणी साचल्यामुळे शनिवारी सकाळी रेल्वे वाहतूक धिम्या गतीने सुरु होती. या पावसाळ्यात मेट्रो प्रकल्प, गटारांची वेळेत साफसफाई न होणे, अरुंद झालेले रस्ते त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी यांसारख्या असंख्य समस्यांना मुंबईकर सामोरे जाणार आहेत एवढं नक्की.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईच्या हवेत वाढते धुरक्याचे प्रमाण

News Desk

नवी मुंबईत कुत्रे होतायत निळे!

News Desk

नौदलाच्या गार्डची गोळी झाडून आत्महत्या

News Desk