HW News Marathi
मुंबई

अन्नदात्याच्या मदतीला अन्नदुत धावला

मुंबई | बळीराजाच्या लॉन्ग मार्चचा सोमवारी सातवा दिवस होताे. रणरणत्या उन्हात आणि भीषण विषम परीस्थितीतही शेतकरी हजारोंच्या संख्येने आपल्या मागण्या शासनदरबारी मंजूर करून घेण्यासाठी शेकडो किलोमीटर पायी चालत आले. सोमवारी ते आझाद मैदानात दाखल झाले असताना अनेकांना प्रवासात लहानमोठ्या दुखापती झाल्या होत्या.फडणवीस सरकारने निवडणूकिदरम्यान दिलेल्या अश्वासनांची पुर्ती अद्याप केली नसून,शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात असंवेदनशिलता दाखविली आहे.

मुंबईचे डबेवाले रोटीबॅन्क चालवतात या बॅन्केच्या माध्यमातुन हजारो भुकेल्यांना डबेवाले दररोज अन्न वाटतात आज मात्र या रोटी बॅन्केच्या माध्यमातुन आझाद मैदान येथे पाचशे शेतकर्यांना डबेवाल्यानी सोमवारी अन्न वाटप केले.

मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते.या सर्वांना अन्न वाटप करणे डबेवाल्यांना शक्य नाही. पण यापैकी काही जणांना डबेवाल्यांनी यावेळी मोफत अन्न वाटप केले.

मुंबईच्या डबेवाल्यांनी कोसो दूर पायपीट करत आलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. कारण शेतकरी जगला तरच आपण जगू शकू असे डबेवाल्यांना वाटते शेतकरी लॉन्ग मार्चला पाठिंबा दर्शविताना डबेवाले असोसिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर म्हणाले, डबेवाला जरी मुंबईत काम करत असला तरी त्याचा मुळात पिंड हा शेतकर्याचाच आहे. त्याचे वडील किंव्हा भाऊ हा गावी शेतीच कष्ट करत असतो. त्यामुळे आमच्या प्रत्येकाच्या घरात शेती आहे व शेतीच्या समस्या काय आहेत यांची आम्हाला चांगली कल्पना आहे. मुंबईचे डबेवाले शेतकऱ्यांच्या पाठीशी असून फडणवीस सरकारने आता झोपेतून जागे होऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत असे आवाहन यावेळी सुभाष तळेकर यांनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंधेरी पोटनिवडणुकीत मालपा डोंगरीमध्ये जाऊन आशिष शेलारांनी मतदारांची घेतली भेट

Aprna

संविधानाची प्रत जळणाऱ्या समाजकंटकांच्या विरोधात लोककलावतांचा निषेध मोर्चा

News Desk

विरोधी पक्षांचे सभागृहात ठिय्या आंदोलन, राज्यपालांची घेणार भेट

News Desk