HW News Marathi
मुंबई

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विषबाधा

मुंबई | बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बी वॉर्डमधील काही अधिकाऱ्यांना आज (३१ जानेवारी) विषबाधा झाली आहे. या रूग्णांना जे.जे. रूग्णालयात दाखल करण्यात आले असून एकूण ८ जणांना विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे. त्यातील एका अधिकाऱ्याची प्रकृती गंभीर असून इतर ७ जणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. या ८ जणांमध्ये चार महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे.

विषबाधा झालेल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दुपारी साडेचारच्या सुमारास जवळपास जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अधिकाऱ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येते आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘Beach Please’ एक अनोखा उपक्रम

News Desk

राज्य सरकारचा निर्णय, मुंबईसह तीन जिल्ह्यात सुटी जाहीर

swarit

अंधेरी कुर्ला रोडवर चालत्या बसला लागली आग

News Desk
राजकारण

दिव्यांगांच्या कार्यक्रमात भाजपच्या बाबुल सुप्रीयो यांची एकाला ‘पाय तोडण्याची’ धमकी

News Desk

नवी दिल्ली । पश्चिम बंगालमध्ये दिव्यांगांसाठी एक शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजपच्या बाबुल सुप्रीयो यांनी क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीला चक्क पाय तोडण्याची धमकी दिली आहे. दिव्यांगांच्या कार्यक्रमात अशा प्रकारचे वक्तव्य करून सुप्रीयो यांनी स्वतःवर वाद ओढवून घेतला आहे.

आसनसोल येथे दिव्यांग व्यक्तींसाठी अत्यावश्यक असलेल्या साहित्य वाटपासाठी एक शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमातील व्यक्तींपैकी एक व्यक्ती सतत हालचाल करत होता. त्याच्या सततच्या हालचालींमुळे चिडून बाबुल सुप्रियो यांनी भर कार्यक्रमात त्या व्यक्तीला चक्क पाय तोडण्याची धमकी दिली आहे.

सध्या सर्वच राजकीय पक्षांमध्ये बेताल वक्तव्ये करून जनतेचा रोष ओढवून घेण्यासाठी चढाओढ लागल्याचे चित्र दिसत आहे. आता पुन्हा एकदा भाजपच्या बाबुल सुप्रीयो यांनी दिव्यांगांच्या कार्यक्रमात जाऊन अत्यंत वादग्रस्त असे विधान केले आहे.

Related posts

राज्यात निवडणुकीदरम्यान ‘या’ घटनांमळे निर्माण झाला तणाव

News Desk

सर्जिकल स्ट्राईकचे चाललेले राजकारण थांबले तरी पुरे | ठाकरे

News Desk

जितेंद्र आव्हाडांनी आमदाराकीचा दिला राजीनामा; जयंत पाटील म्हणाले…

Aprna