HW News Marathi
मुंबई

रस्त्याच्या दुरावस्थेप्रकरणी पालिकेकडून कंत्राटदारांवर करवाई

मुंबई | घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडच्या रस्त्यांच्या दुरावस्थेनंतर महापालिकेने कंत्राटदारांवर कारवाई करत १ लाख रुपयांचा दंड आकारला आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा रस्त्यांच्या खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घाटकोपर-मानखुर्द लिंग रोडची देखभाल करण्याची जबाबदारी ही बीपीएससीपीएल आणि विशाल कन्स्ट्रक्शन यांच्या जॉईट व्हेन्चरची होती. या रस्त्याची देखभाल योग्य पद्धतीने न केल्यामुळे त्यांना पालिकेने एक लाख रुपयांचा दंड आकारला आला आहे.

ही दुरवस्था पाहूण पालिकेने आतापर्यंत कंत्राटदारांवर पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली होती. परंतु आता कंत्राटदारांना चार दिवसांची मुदत देत एक लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील तीन किलोमीटर पॅचची अवस्था भीषण आहे. या भागात जागोजागी खड्डे असल्याच्या अनेक तक्रारी पालिका आयुक्तांकडे आल्या आहेत. यानंतर पालिका आयुक्तांनी एक बैठक आयोजित करून हा निर्णय घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पेट्रोलपंपावरील बेकायदेशीर छापे न थांबल्यास बेमुदत संपाचा इशारा

News Desk

मुंबई महापालिकेचा २०१८-१९ चा अर्थसंकल्प सादर

swarit

आयसीटी शिक्षकांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू – राज ठाकरे

News Desk
मुंबई

माटुंगा रोड स्टेशनजवळील पादचारी पुलाला तडे

News Desk

मुंबई | मुंबईतील पादचारी पुलांचा प्रश्न आता दिवसेंदिवस अधिक गंभीर होताना दिसत आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील माटुंगा येथील पादचारी पुलाला तडा गेल्याने पुल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी १५ जुलैपासून मुंबई महापालिकेने तडे गेल्याने पादचारी पुल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुल एका बाजुने खाली झुकल्याने पुल धोकादायक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पुल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

माटुंगा रोड स्टेशनजवळील पादचारी पुलाला मोठा तडा गेल्याने पूल वापरासाठी बंद करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी पुलाला तडा गेला होता, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेनं पूल वापरासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील माटुंगा स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी या पुलाचा प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे पुलाची लवकरात लवकर डागडुजी करून वापरासाठी खुला करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

Related posts

मंत्रालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; नेमके काय घडले?

Aprna

पंतप्रधान मोदींचा आज एकदिवसीय मुंबई दौरा; विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम

Aprna

सभागृहाच्या सार्वभौमत्वावर घाला घालून चुकीचे पायंडे पाडू नका; अजित पवारांनी सरकारला सुनावले खडेबोल

Aprna